शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
2
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
3
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
6
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
7
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
8
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
9
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
10
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
11
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
12
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
13
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
14
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
15
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
16
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
17
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
18
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
19
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
20
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'

RajyaSabha Election Maharashtra: अखेर फडणवीसांनी फासे टाकलेच! मविआला शब्द दिला, पण...; भाजप नेत्यांची बैठक सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 12:26 PM

महाविकास आघाडीचे नेते निघून गेल्यावर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि त्यानंतर पोहोचलेले माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यात बैठक सुरु आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोण माघार घेणार की मतदानाची चुरस रंगणार याचे चित्र दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होईल. उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अशावेळी मविआचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. यावेळी बिनविरोधचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या फडणवीसांनीच मविआसमोर आपले फासे टाकत चेंडू ठाकरे सरकारच्या कोर्टात टोलविला आहे. 

RajyaSabha Election Maharashtra: मविआ नेत्यांनी फडणवीसांची भेट का घेतली? शिवसेना संकटात; मोठे कारण समोर आले

महाविकास आघाडीची भाजपाला ऑफर; ३ वाजेपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर...

राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ, सुनील केदार, शिवसेना खासदार अनिल देसाई हे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गेले होते. या नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. ही चर्चा भुजबळ यांनी सकारात्मक झाल्याचा दावा केला आहे. 

मविआची ऑफर नेमकी काय? राज्यसभेची निवडणूक आम्हाला बिनविरोध करायची आहे, यामुळे भाजपाने राज्यसभेची उमेदवारी मागे घ्यावी, विधानपरिषदेला आम्ही जादाच्या जागा तुम्हाला देऊ, असा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांसमोर ठेवला. परंतू यात माहीर असलेल्या फडणवीसांनी राज्यसभेला तुमचा उमेदवार मागे घ्या आम्हीच तुम्हाला विधानपरिषदेत जागा सोडू, असा उलट प्रस्ताव दिला आहे. 

महाविकास आघाडीचे नेते निघून गेल्यावर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि त्यानंतर पोहोचलेले माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यात बैठक सुरु आहे. मविआच्या प्रस्तावावर विचार करायचा की आपला उमेदवार तसाच ठेवायचा यावर या बैठकीत चर्चा सुरु झाली आहे. यातच मविआच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन फडणवीस यांना जाण्याची शक्यता आहे. 

शिवसेना अडकित्यात अडकली...काही महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यातच राज्यसभेची जागा शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. भाजपाने शिवसेनेला यावरून खिंडीत अडवण्यासाठी आपलाही उमेदवार दिला आहे. त्यातच काँग्रेसने राज्याबाहेरील उमेदवार दिल्याने मोठा पेच झाला आहे. काँग्रेसला आपल्याच आमदारांची मते पडतील की नाही याची शाश्वती नाहीय. यामुळे शिवसेनेला उमेदवार माघारी घेण्यास भाग पाडायचे, एवढा एकच पर्याय काँग्रेस नेत्यांना दिसत आहे. दुसरीकडे भाजपा वरचढ ठरेल याची चिंता शिवसेनेला आहे. महापालिका निवडणुकीआधीच राज्यातील सत्ता गमविणे शिवसेनेला परवडणारे नाही. तसेच पालिकांमध्ये तीन पक्ष एकत्र लढले तर फायदा होईल, ते देखील नुकसान झाले तर परवडणार नाही. यामुळे राज्यसभेतून माघार घेणेच शिवसेनेला सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार योग्य ठरेल.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRajya Sabhaराज्यसभाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस