शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

Rajya Sabha Election Result: अजूनही वेळ गेली नाही, आपले लोकं...; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा शिवसेनेला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 15:37 IST

एकंदरीत अपक्ष आमदारांची नाराजी सरकारवर होती. पक्षाच्या आमदारांचीही कामे होत नाहीत. त्यामुळे कुरबूर होती असं त्यांनी सांगितले. 

उस्मानाबाद - राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत अनपेक्षितरित्या भाजपाचे ३ उमेदवार निवडून आल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत होती. सुरुवातीच्या मतमोजणीत शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे इमरान प्रतापगढी पहिल्या पसंतीची मते घेऊन निवडून आले. परंतु सहाव्या जागेसाठी धनंजय महाडीक आणि संजय पवार यांच्यात चुरस निर्माण झाली. 

राज्यसभेच्या निकालात शिवसेनेचे संजय पवार हे पराभूत झाले. त्यानंतर आता विरोधकांनी शिवसेनेवर चहुबाजेने टीका सुरू केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर(MNS Bala Nandgoankar) म्हणाले की, अपक्ष आमदारांना खूप चांगल्या प्रकारे सांभळावं लागतं. अपक्ष आमदार स्वत:च्या ताकदीवर पैसे खर्च करून निवडून येतात. ५ वर्ष त्यांची जी काही कामे असतात ती करावी लागतात. एकंदरीत अपक्ष आमदारांची नाराजी सरकारवर होती. पक्षाच्या आमदारांचीही कामे होत नाहीत. त्यामुळे कुरबूर होती असं त्यांनी सांगितले. 

तसेच पक्षातंर्गत नाराजीचा फटका शिवसेनेला बसला आहे. आताही वेळ गेलेली नाही. आपली लोक आपल्याला सांभाळावी लागतात. प्रेमाने सांभाळावी लागतात. आता पूर्वीचे दिवस राहिले नाहीत. बाळासाहेबांच्या एका आदेशाने ते घडत होते. आता पक्षप्रमुखांनी पक्ष सांभाळावा, आजूबाजूच्या लोकांनी नव्हे अशा शब्दात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला दिला आहे. 

भाजपाचाही टोलासंजय राऊत यांनी विजयाची व्याख्या पुन्हा करावी. यालाच म्हणतात जोर का झटका धीरेसे लगे. धक्का लगाल्यानंतरही विचारलं तर शरद पवार म्हणतील लागले नाही. ही तर पहिलीच वेळ आहे. पुढे वीस तारीख आहे. त्याच्यानंतरही पुढचा काळ आहे. त्यांना धक्क्यावर धक्के सहन करावेच लागणार आहे. तेव्हादेखील त्यांनी म्हणावे की काही लागले नाही, असा खोचक टोला भाजपचे विजयी उमेदवार डॉ. अनिल बोंडे यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही. मुख्यमंत्र्यांना आज कोणता आमदार भेटू शकतो? मंत्रीतरी भेटू शकतो का? अशी विचारणा करत अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBala Nandgaonkarबाळा नांदगावकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना