शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेच्या मतमोजणीत ट्विस्ट; निकालासाठी मध्यरात्रीपर्यंत वाट पाहावी लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 6:44 PM

जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून काही प्रतिसाद येत नाही तोवर मतदानाला सुरूवात होणार नाही.

मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत विधानसभेच्या २८५ आमदारांनी मतदान केले. परंतु मतदानावेळी भाजपा आमदार पराग अळवाणी यांनी महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेत ही मते बाद करावीत अशी मागणी केली. तर भाजपाचे नेते बावचळेत असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी केला. परंतु आता याबाबत भाजपाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. 

जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून काही प्रतिसाद येत नाही तोवर मतदानाला सुरूवात होणार नाही. भाजपा नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, भाजपाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटले. महाराष्ट्र आणि हरियाणा येथे राज्यसभा निवडणुकीत उघडपणे मतदानाच्या प्रक्रियेचे उल्लंघन झाले. त्याबाबत स्थानिक नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदानात झालेल्या नियमभंगामुळे ही मते बाद करावीत अशी मागणी आम्ही केलीय. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितले. 

काय आहे प्रकरण?राज्यसभेच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी ४१ मतांची गरज आहे. त्याच मविआची ३ मते बाद करावीत असं भाजपाने मागणी केली आहे.  पहिल्या फेरीत निवडून जाण्यासाठी ४१ मतांची गरज आहे. राष्ट्रवादीने ९ मते शिवसेनेला दिली आहेत. भाजपाचा आक्षेप निवडणूक आयोगाने मान्य केल्यास महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवारासाठी अडचण होऊ शकते. 

२०१७ च्या निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या प्रकरणातही मते बाद झाल्याने पटेल यांचा विजय झाला होता. त्यावेळी एका जागेसाठी ४५ मतांची गरज होती. मात्र काँग्रेसची २ मते फुटली होती. तेव्हा काँग्रेसच्या त्या दोन आमदारांचे मत रद्द करण्यात यावे यासाठी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. भाजपानेही पीयुष गोयल, अरुण जेटली या दिग्गज नेत्यांची रवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. शेवटी निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. मध्यरात्रीपर्यंत निवडणूक आयोगाकडून या प्रकरणाचा तिढा सोडवला. त्यानंतर ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले त्यांचे २ मत बाद झाले. परिणामी विजयासाठी लागणारी मते ४५ वरून ४४ वर आली. पुन्हा मतमोजणी करत अहमद पटेल यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती. त्याचप्रमाणे यंदा महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणुकीत तिढा निर्माण झाला आहे. त्याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहचला आहे. त्यामुळे मतमोजणी खोळंबली आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगShiv SenaशिवसेनाBJPभाजपा