शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

RajyaSabha Election Maharashtra: मविआच्या प्रस्तावावर दिल्लीतून निरोप आला; चंद्रकांत पाटलांनी सांगितले चर्चेत काय काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 1:05 PM

बैठक संपल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी दिल्लीला मविआच्या प्रस्तावाचा निरोप कळविल्याचे सांगितले. यावर आपली भूमिकाही सांगितली.

मविआचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. यावेळी दोन्ही बाजूंकडून एकमेकांना एकसारखीच ऑफर देण्यात आली. यामध्ये राज्यसभेचा उमेदवार माघारी घ्या, त्याबदल्यात विधानपरिषदेला जागा देऊ, असा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला भाजपाने नकार दिला आहे, तर आम्ही यावर विचार करतो, असे सांगून मविआ नेते बाहेर पडल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

RajyaSabha Election Maharashtra: मविआ नेत्यांनी फडणवीसांची भेट का घेतली? शिवसेना संकटात; मोठे कारण समोर आले

RajyaSabha Election Maharashtra: अखेर फडणवीसांनी फासे टाकलेच! मविआला शब्द दिला, पण...; भाजप नेत्यांची बैठक सुरु

बैठक संपल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी दिल्लीला मविआच्या प्रस्तावाचा निरोप कळविल्याचे सांगितले. यावर आपली भूमिकाही सांगितली. यावर दिल्लीवरून आम्हाला तुमची भूमिका योग्य असल्याचे कळविण्यात आल्याचे पाटील म्हणाले. शिवसेनेकडे एकडून तिकडून जोडलेली तीस मते देखील नाहीत. तर आमच्याकडे तीस मते आहेत. आमचा पक्ष राष्ट्रीय आहे. त्यामुळे राज्यसभेची जागा आमच्यासाठी महत्वाची आहे. मविआने राज्यसभेचा उमेदवार मागे घेतला तर आम्ही विधानपरिषदेची पाचवी जागा लढविणार नाही, असे आम्ही मविआच्या नेत्यांना सांगितल्याचे पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडीच्या नेत्यांचा काल देवेंद्र फडणवीसांना फोन आला होता. राज्यसभेच्या उमेदवारीचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यावरून चर्चा करायची असल्याने आमचे ज्येष्ठ नेते सकाळी भेटण्यासाठी येतील, अशी विनंती त्यांनी केली. तेव्हाच फडणवीस यांनी त्यांना आम्ही उमेदवारी माघारी घेणार नाही, तुम्ही जो प्रस्ताव घेऊन याल त्यावरू विचार करू, असे म्हटले होते. आज त्यांनी दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नाही, आम्ही आमचा तिसरा उमेदवार मागे घेणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

महाविकास आघाडीची भाजपाला ऑफर; ३ वाजेपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर...

शिवसेनेकडे जादाची १३ मते आहेत. राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात आहेत. त्यामुळे ते मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची ८-९ मते आहेत. याउलट आमच्याकडे ३० मते आहेत. यामुळे त्यांनी उमेदवारी माघारी घ्यावी, ही वस्तूस्थिती चर्चेमध्ये मांडली. चर्चा खेळीमेळीत झाल्याचे पाटील यांनी सांगितले. 

गेल्या 20 वर्षांची परंपरा आहे की, राज्यसभा-विधान परिषदेत जर निवडणुका झाल्या तर क्रॉस वोटिंग होतं आणि प्रचंड गोंधळ होतो. परंतू ज्यावेळी बिनविरोध होते त्यावेळी वस्तूस्थितीच्या आधारे होते. त्यामुळे आमचा आग्रह आहे की, राज्यसभेच्या भाजपला तीन जागा मिळाव्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या बाबतीत काही विचार करता येईल. मविआच्या नेत्यांनी खूप चर्चा झाल्यावर तोच-तोच प्रस्ताव मांडला, असेही पाटील म्हणाले.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलRajya Sabhaराज्यसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना