शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
3
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
4
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
5
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
6
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
7
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
8
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
9
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
10
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
11
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
12
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
13
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
14
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
15
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
16
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
17
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
18
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
19
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
20
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

RajyaSabha Election Maharashtra: मविआ नेत्यांनी फडणवीसांची भेट का घेतली? शिवसेना संकटात; मोठे कारण समोर आले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 11:54 AM

शिवसेना खासदार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री आज लगबगीने फडणवीसांच्या बंगल्यावर गेले होते. विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबद्दल जी भीती वाटत होती, तीच भीती पुन्हा वाटू लागली आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात रणकंदन सुरु असताना महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने नुकतीच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. परंतू, भाजपा आता माघार घेण्याच्या मूडमध्ये नाही, असे स्पष्ट संकेत फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिल्याने शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यातूनच मविआच्या नेत्यांनी फडणवीसांची भेट का घेतली याचे मोठे कारण समोर आले आहे. 

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आमदारांची मते न फुटण्यासाठी व्हीप जरी जारी केला तरी देखील भाजपाला मते देणाऱ्या आमदारांवर कारवाई होऊ शकत नाही, असे गुरुवारीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीची मते फुटली तर शिवसेनेच्या किंवा काँग्रेसच्या लादलेल्या उमेदवाराचा पराभव होण्याची भीती मविआला वाटत आहे. दुसरीकडे फडणवीसांनी आमच्या सहाव्या जागेसाठीच्या मतांची बेगमी झाली आहे, त्यामुळे उमेदवार मागे घेणार नसल्याचे मविआच्या शिष्टमंडळाला सांगितले आहे. 

यामुळे शिवसेनेला विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबद्दल भीती वाटत होती, तीच भीती पुन्हा वाटू लागली आहे. आमदारांची मते फुटली तर पराभव नक्की आणि त्याहूनही मोठी बाब म्हणजे जर काँग्रेसचा उमेदवार इम्रान प्रतापगढी यांचा पराभव झाला तर राज्यातील सत्ता जाणे देखील नक्की, अशा पेचात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अडकले आहेत. 

इम्रान प्रतापगढी हे प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. काहीही झाले तरी प्रतापगढींना निवडून आणा, असा स्पष्ट निरोप काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आला आहे. यामुळे आपल्या आमदारांवर विश्वास नसलेल्या काँग्रेसने शिवसेनेवर उमेदवार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. यातच प्रतापगढी यांची उमेदवारी लादल्याने राज्यातील काँग्रेस नेते नाराज आहेत. यामुळे हे नाराज आमदार फुटण्याची दाट शक्यता काँग्रेसला वाटत आहे. यामुळे राज्यसभेची एक जागा महत्वाची की राज्यातील सत्ता, असा सूचक इशाराच काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेला देण्यास सुरुवात केली आहे. या पेचात अडकल्यानेच शिवसेना खासदार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री आज लगबगीने फडणवीसांच्या बंगल्यावर गेले होते. परंतू तिथेही त्यांना नकार मिळाल्याने शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 

शिवसेना अडकित्यात अडकली...काही महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यातच राज्यसभेची जागा शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. भाजपाने शिवसेनेला यावरून खिंडीत अडवण्यासाठी आपलाही उमेदवार दिला आहे. त्यातच काँग्रेसने राज्याबाहेरील उमेदवार दिल्याने मोठा पेच झाला आहे. काँग्रेसला आपल्याच आमदारांची मते पडतील की नाही याची शाश्वती नाहीय. यामुळे शिवसेनेला उमेदवार माघारी घेण्यास भाग पाडायचे, एवढा एकच पर्याय काँग्रेस नेत्यांना दिसत आहे. दुसरीकडे भाजपा वरचढ ठरेल याची चिंता शिवसेनेला आहे. महापालिका निवडणुकीआधीच राज्यातील सत्ता गमविणे शिवसेनेला परवडणारे नाही. तसेच पालिकांमध्ये तीन पक्ष एकत्र लढले तर फायदा होईल, ते देखील नुकसान झाले तर परवडणार नाही. यामुळे राज्यसभेतून माघार घेणेच शिवसेनेला सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार योग्य ठरेल. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस