शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

कृषी विभागाचा कारभार ‘राम भरोसे’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2016 5:35 AM

शेतकऱ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या कृषी विभागात मात्र अधिकारी आणि कर्मचारीची वाणवा आहे.

अतुल कुलकर्णी,

मुंबई- कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी अशा नैसर्गिक दृष्टचक्रात अडकलेले शेतकरी, आत्महत्यांचे न संपणारे सत्र असे चित्र एकीकडे असताना , दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या कृषी विभागात मात्र अधिकारी आणि कर्मचारीची वाणवा आहे. आजमितीला अ, ब, क आणि ड या चार संवर्गातील मिळून तब्बल ७४११ जागा रिक्त आहेत. यातील तब्बल १५०८ जागा पदोन्नती अभावी रिक्त आहेत, तर निवृत झालेले आणि आजारी रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ८ हजाराहून अधिक जागा भरल्या गेलेल्या नाहीत.राज्यात कृषीसंचालकांच्या ५ जागा आहेत, त्यापैकी ४ जागा रिक्त आहेत. कृषी सहसंचालकांच्या १४ पैकी ५ जागा रिक्त आहेत. वरिष्ठ पदावरील खुर्च्या रिकाम्या असल्याने खालून वरपर्यंत येणाऱ्या फाईल किती गतीने हलत असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.गट अ संवर्गातील २८, ब संवर्गातील ७९२ तर गट क संवर्गातील ४९९५ आणि ड संवर्गातील १५९६ जागा रिकाम्या आहेत. या ७४११ पैकी ५९०३ जागा सरळसेवेने भरवयाच्या आहेत. मात्र, त्यासाठी अद्याप भरती प्रक्रियाच सुरू झालेली नाही.शेतीच्या कामासाठी महत्वाची असणारी अधिक्षक, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, आरेखक, अनुरेखक, माळी अशी महत्वाची पदे देखील शेकडोंनी रिक्त आहेत. सरकारने एखाद्या कृषी योजनेचा आढावा घ्यायचे ठरवले किंवा शेतकऱ्यांपर्यंत नवीन योजना पोहोचविण्याचे ठरवले तरी देखील आज मितीला सरकारकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुनशेतकऱ्यांना ज्ञान देण्याची कोणतीही योजना आज सरकारजवळ नाही. परिणामी यावर्षी चांगला पाऊस होऊनही शेतकऱ्यांना ‘राम भरोसे’ सोडण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.