शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

मी ५० हजार लोक घेऊन तिथं येतो, मग बघू...; नाना पटोलेंचा राहुल गांधींना निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 5:31 PM

प्रत्येक धर्मात नियम असतात. परंतु राजकारणासाठी इव्हेंट केला जात असेल तर योग्य नाही असं सांगत नाना पटोलेंनी भाजपावर टीका केली. 

मुंबई - आपल्या देशात धर्माच्या नावानं राजकारण सुरू आहे. रामाचं नाव घ्यायचे अन् दुसरीकडे द्वेष पसरवायचा याचा आम्ही निषेध करतो. आसाममध्ये राहुल गांधी मंदिरात दर्शन करण्यासाठी जाताना त्यांना प्रवेश नाकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काळाराम मंदिरात दर्शन नाकारणारी प्रवृत्ती सत्तेत आलेत का असा प्रश्न उभा राहतो. भगवान श्री रामाने अहिंसेचा मार्ग आम्हाला शिकवला. परंतु भाजपाच्या लोकांना सत्तेचा माज आला. तो माज उतरवल्याशिवाय देशातील जनता स्वस्थ बसणार नाही असा निशाणा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर साधला आहे. 

नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधींच्या यात्रेला आसाममध्ये रोखण्याचे काम केले जात आहे. मंदिरात जाण्यापासून राहुल गांधींना रोखले गेले. यात्रेच्या वाहनावर दगडफेक करणे,  मारहाण करणे हे भगवान श्री रामानं शिकवले का?. आमच्या नेत्यांना मी म्हणालो तुम्ही आवाहन करा, चलो आसाम, मग कुठले मुख्यमंत्री, पंतप्रधान काय करतात ते बघू. तुम्हाला अडवलं तर आम्ही येतो, महाराष्ट्रातून मी ५० हजार लोक घेऊन येतो, देशातून असे लोक तिथे गेले तर काय होईल बघू,  मी माझा विचार राहुल गांधींसमोर मांडला. तेव्हा आपल्याला अहिंसेच्या मार्गातून जायचे आहे. कुठलाही उद्रेक नको. आपण अहिंसा, प्रेमाने जनतेला जिंकायचे. सत्याच्या मार्गाने विजय झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच गुजरातमधील सोमनाथाचे मंदिर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीत करण्यात आले. त्याचा गाजावाजा केला नाही. अयोध्येतील मंदिराबाबत शंकराचार्यांनी विरोध केला. मात्र हे धर्मापेक्षा आणि शंकराचार्यापेक्षा मोठे झाले आहेत. भाजपाला काय उत्सव साजरा करायचा हा अधिकार त्यांचा आहे. भगवान श्रीरामाला लहान आणि मोदींना मोठे करायचे असेल तर काय बोलणार. भगवान श्री रामाला भाजपा लहान मानायला लागले आहेत. भाजपाच्या गर्वाचे हरण आज ना उद्या होणारच आहे. राजीव गांधी यांनी राम मंदिराचा ताळा उघडला होता. त्यांनीच पूजा केली. मात्र कारसेवक, मुस्लीमांचे रक्त भाजपाने वाहिले. जो उद्रेक भाजपाने केला, ज्यांचे जीव गेले त्यांचे काय?. हिंदू शंकराचार्य हे भाजपावर टीका करतायेत. अशा शंकराचार्यांवर भाजपा टीका करते. प्रत्येक धर्मात नियम असतात. परंतु राजकारणासाठी इव्हेंट केला जात असेल तर योग्य नाही असं सांगत नाना पटोलेंनी भाजपावर टीका केली. 

दरम्यान, रामनाम जपायचे अन् पैसे लुटायचे हे भाजपाचे काम आहे. लोकांकडून लुटलेले पैसे मूठभर मित्रांकडे पाठवले जातात. अपूर्ण मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. शंकराचार्यांनी हे करू नये अशी भूमिका घेतली. पण भाजपाने राजकीय फायद्यासाठी हा इव्हेंट घेतला. त्यामुळे निमंत्रण मिळूनही अनेकांनी या सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिला. अहंमपणा रामाने शिकवला नाही. अहंमपणाचा नाश रामाने केला असं नाना पटोले यांनी म्हटलं.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी