शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"रामदास आठवले हे भाजपाच्या झाडावरचं बांडगुळ”, मनसे नेते प्रकाश महाजन यांची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 20:29 IST

Prakash Mahajan Criticize Ramdas Athawale: मी महायुतीसोबत असताना राज ठाकरे यांची महायुतीला आवश्यकता नाही? असं विधान केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे प्रमुख रामदास आठवले यांनी केलं होतं. त्यावरून आता मनसेकडून रामदास आठवले यांच्यावर बोचरी टीका करण्यात येत आहे.

मी महायुतीसोबत असताना राज ठाकरे यांची महायुतीला आवश्यकता नाही? असं विधान केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे प्रमुख रामदास आठवले यांनी केलं होतं. त्यावरून आता मनसेकडूनरामदास आठवले यांच्यावर बोचरी टीका करण्यात येत आहे. दरम्यान, रामदास आठवले हे भाजपाच्या झाडावरचं बांडगुळ आहे, असं विधान मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलं आहे.

मनसे नेते प्रकाश महाजन रामदास आठवलेंवर निशाणा साधताना म्हणाले की, रामदास आठवले यांनी असं विधान प्रसारमाध्यमांसमोर करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा करावी. आमचे हिंदुत्वाचे विचार सारखेच असल्याने आम्ही राज ठाकरेंच्या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोबत घेण्याबाबत विचार करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. रामदास आठवलेजी तुमचा पूर्ण आदर करून सांगतो की, गोपिनाथ मुंडे यांनी तुम्हाला भाजपाच्या झाडाखाली आणलं. तुम्ही त्या झाडावर चढलात आणि आता तुम्ही त्या झाडाचं एक बांडगुळ आहात. तुमच्यामुळे भाजपाला काहीही फायदा नाही. मात्र भाजपामुळे तुम्ही अखंड मंत्रिपदावर आहात, हे रामदास आठवले यांनी लक्षात घ्यावं. तसेच तुम्ही काचेच्या घरात आहात याचा विचार करावा. रामदास आठवले यांच्याबाबत पूर्ण आदर ठेवून मी हे विधान करत आहे कारण त्यांनी माझ्या नेत्यावर टीका केली आहे, अशे प्रकाश महाजन म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका करताना रामदास आठवले म्हणाले होते की, "पुढे याबाबत काय निर्णय होणार आहे हे मला माहिती नाही. पण महायुतीमध्ये राज ठाकरे यांना घेण्यामध्ये अजिबात फायदा नाही. त्यांची हार्ड लाईन असल्यामुळे त्यांचा विशेष आपल्याला फायदा होणार नाही. मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे? त्यामुळे त्यांची महायुतीमध्ये आवश्यकता नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही त्यांना बरोबर घ्याल पण ते येतील की नाही माहिती नाही. महापालिकेच्या निवडणुकीत काय निर्णय होईल मला माहिती नाही. पण महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा फायदा होऊ शकतो. काही ठिकाणी त्यांचा थोडा उपयोग होऊ शकतो. काय निर्णय घ्यायचा तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेतील. माझं व्यक्तिगत मत आहे की, त्यांना सोबत घेतल्याने महायुतीचे नुकसानचं होणार आहे," असा टोला रामदास आठवले यांनी लगावला होता. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे