शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

रामदासांनी पुराच्या पाण्यात काढले २० तास पाण्यात

By admin | Published: September 23, 2016 2:57 PM

तेरणा नदीला आलेल्या पूरात एक इसम तब्बल २० तास अडकून पडला होता, अखेर स्थानिक मच्छिमारांनी त्याला वाचवले.

बालाजी थेटे, ऑनलाइन लोकमत
औराद शहाजानी ( लातूर), दि. २३ -  तेरणा नदीला आलेल्या पूरात एक इसम तब्बल २० तास अडकून पडला होता, अखेर स्थानिक मच्छिमारांनी त्याला वाचवले. रामदास खरटमोल असे त्या इसमाचे नाव आहे. 
मी नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास शेतात गेलो. शेतातील म्हशीला चारण्यासाठी सोडले. दुपारी दीडच्या सुमारास अचानक मांजरा व तेरणा नदीला पूर आला आणि शेतातच पाणी घुसले. जीव वाचविण्यासाठी म्हैस, श्वानास उंचवट्यावर नेत होतो. पण वाढत्यामुळे उंचवट्याची धरणीही संपली. अखेर शेतातील चारपाईला म्हशीला बांधले आणि कुत्र्याला सोबत घेऊन झाडावर चढलो. त्यामुळे पुराच्या पाण्यात २० तास अडकून होतो. सुदैवाने स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बचावलो, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथून वाहणा-या तेरणा व मांजरा नद्यांना पूर आला आहे. औराद शहाजानी येथील रामदास श्रीरंग खरटमोल (वय ३२) यांचे या नद्यांच्या पाच एकर काठावर शेती आहे. नेहमीप्रमाणे ते गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेताकडे गेले होते. म्हशीला चारण्यासाठी सोडले असता दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोन्ही नद्यांंना पाणी वाढले आणि त्यांच्या शेतातून पाणी वाहू लागले. काही मिनिटांतच चार एकर शेतात पाणी थांबल्याने जीव वाचविण्यासाठी दोन जनावरांसह औराद-वांजरखेडा रस्त्याच्या उंचवट्याकडे धाव घेतली. उंचवट्यावर थांबलो; पण मांजरा नदीचे २० फुटांपर्यंत पाणी चढले तर तेरणा नदीचे ५० फुटांपर्यंत पाणी वाढले. 
नजर फिरेल तिकडे पाणीच पाणी दिसू लागल्याने पुरातून बाहेर पडण्याचा मार्ग अंधारमय दिसू लागला. सोबत मोबाईल असल्याने कुटुंबियांना परिस्थितीची माहिती दिली. त्यामुळे आई, वडील, पत्नी व तीन मुले चिंताग्रस्त झाली. मी पाण्यातून सुखरुप बाहेर पडावा म्हणून कुटुंबियांनी देव पाण्यात ठेवून प्रार्र्थना करण्यास सुरुवात केली. 
दिवस जस जसा मावळू लागला, तस तसे पाणी वाढू लागले. शेतातील गोठा पाण्याखाली गेला. त्यामुळे काय करावे सुचेना. दोन जनावरांसह चारपाई घेऊन रस्त्यावरील उंचवट्यावर थांबलो. दरम्यान, पुराचे पाणी कमी होण्याऐवजी चढतच असल्याने अखेर म्हशीस चारपाईला बांंधून श्वानाला सोबत घेऊन झाडावर चढलो. दरम्यान, आपण पाण्यात अडकल्याची माहिती शेजारील शेतकरी शिवकुमार आग्रे व दिलीप कत्ते यांना दिली. 
रात्री झाली आणि जोराचा पाऊस सुरू झाला. जीव मुठीत धरून झाडावरच बसून होतो. कुटुंबियांना बोलावे म्हटले तर मोबाईलची चार्चिंगही संपली. त्यामुळे जगाशी संपर्कच तुटला. कुटुंबियांची आठवण येऊ लागल्याने ही शेवटची घटका तर नाही, अशी शंका मनात येऊ लागली. सकाळ झाली आणि ९ वाजता गावातील धनसिंग भोई, रामसिंग भोई, परशुराम भोई, मोहनसिंह भोई हे टायरचे ट्यूब घेऊन माझ्याकडे येत असल्याचे पाहून जीवात जीव आला. त्यांनी मला ट्यूबवर बसवून सोबत म्हैस व श्वानास घेऊन पाण्यातून मार्ग काढीत बाहेर पडलो.