शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

"शिंदेंना CM करायचे नाही"; BJP ने हकालपट्टी करताच माजी आमदार म्हणाले, "आता कॉम्प्रमाईज..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 11:25 IST

भाजपने पक्षातून निलंबित केल्यानंतर माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत.

Mallikarjun Reddy : भाजपचे रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर मंगळवारी पक्षाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या घटक पक्षावर केलेल्या टीकेनंतर भाजपकडून मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर तब्बल सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे नव्हेत तर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे आगामी काळात निवडणुकीनंतर मुख्यमंत्री हवेत, असं वक्तव्य मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केलं होतं. तसेच मला फाशी दिली तरी चालेल पण आशिष जयस्वाल यांचे काम करणार नाही, असेही रेड्डी यांनी म्हटलं होतं. पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर रेड्डी यांनी आता पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू ठोकला आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाची शिस्त मोडून पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत रेड्डींवर ही कारवाई करण्यात आलीय. नागपूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकमधून आमदार आशिष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर जयस्वाल यांच्या  उमेदवारीला विरोध करत मल्लिकार्जुन रेड्डी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मल्लिकार्जून रेड्डी यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातून हकालपट्टी केली. भाजपाचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला, तर कठोर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे रेड्डींवरील कारवाईनंतर म्हणाले. 

पक्षातून हकालपट्टी केल्यानंतरही मल्लिकार्जुन रेड्डी यांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. आता कॉम्प्रोमाइज नाही म्हणत  मल्लिकार्जुन रेड्डी यांनी  बंडखोरी करण्याचे संकेत दिले आहेत. "आता रामबाण निघाला आहे, आता तो थांबणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालातून हे स्पष्ट होईल. मी कोणत्याही स्थितीत कॉम्प्रमाइज करणार नाही. मी कॉम्प्रमाईज करणारा नाही. २० वर्षांपासून आशिष जयस्वाल कोणाची तरी मदत घेऊन निवडणूक जिंकत आला आहे. त्याच्यामुळे रामटेकमध्ये भाजप संपत चालली आहे," असं मल्लिकार्जुन रेड्डी यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मल्लिकार्जुन रेड्डी?

जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मल्लिकार्जून रेड्डींनी शिंदेंनाही लक्ष्य केले. "एकनाथ शिंदे हे ॲक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत. त्यांना आता आम्हाला मुख्यमंत्री करायचं नाही. भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे. मला फाशी दिली तरी चालेल पण आशिष जयस्वाल यांचं रामटेकमध्ये काम करणार नाही," असं रेड्डी यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ramtek-acरामटेकvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपा