शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

राणेंनी नियमित केलेले भूखंड नियमबाह्यच

By admin | Published: August 06, 2016 3:29 AM

१६८ भूखंडांचे झालेले बेकायदा वाटप नियमित करण्याचा तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नियमबाह्य ठरविला़

अहमदनगर : येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील १६८ भूखंडांचे झालेले बेकायदा वाटप नियमित करण्याचा तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नियमबाह्य ठरविला़ त्याचबरोबर हा निर्णय राज्यातील सर्व उद्योगांना लागू राहणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे़नागापूर औद्योगिक वसाहतीतील १६८ भूखंडांचे झालेले बेकायदा वाटप उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केले होते. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उद्योजकांच्या आमी संघटनेसह तीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी़ एस़ ठाकूर व चंद्र खानवीलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला़ या भूखंडांवर उद्योजकांनी बांधकामे केली असून, सध्या या जागेवर कारखाने सुरू आहेत़ भूखंड ताब्यात घेण्याचा खंडपीठाचा निर्णय न्यायमूर्तींनी कायम केल्याने नगरच्या उद्योगक्षेत्रात खळबळ उडाली आहे़औद्योगिक वसाहतीतील भूखंड वाटपासंदर्भात अजित महांडुळे, विष्णू ढवळे, रुपेश पानसंबळ आणि सोमनाथ कराळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जुलै २०१३ मध्ये याचिका दाखल केली होती़ याचिकेची सुनावणी सुरू असतानाच आमी संघटनाही यात सहभागी झाली़ दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाचे न्या़ एस़ एस़ शिंदे व न्या़ एस़ एस़ संगीतराव पाटील यांच्या खंडपीठाने भूखंडांचे झालेले वाटप नियमबाह्य ठरवित रद्द केले़ एवढेच नव्हे तर भूखंड ताब्यात घेवून त्याचा लिलाव करावा व निविदा पध्दतीने पुन्हा वाटप करा व भूखंड वाटप करणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले़ उद्योजकांनी बचावासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली़ तीन वेगवेगळ्या याचिका यासंदर्भात उद्योजकांनी न्यायालयात दाखल केल्या़ त्यावर न्यायामूर्ती पी़ एस़ ठाकूर व चंद्र खानविलकर यांच्या खंडपीठासमोवर सुनावणी झाली़ न्यायमूर्तींनी वाटप नियबाह्यच असल्यावर शिक्कामोर्तब करत भूखंड ताब्यात घेण्याचा निर्णय कायम ठेवला़ याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील नितीन गवारे यांनी बाजू मांडली़ तर आमी संघटनेच्या वतीने अभिषेक सिंघवी, श्याम दिवाण, इतर उद्योजकांच्या बाजूने शेखर नाफाडे, जयंत भूषण आणि कामगारांची बाजू सुधाकर देशमुख यांनी मांडली़ (प्रतिनिधी)>१७ पट दंड भरून भूखंड नियमितचे आदेशज्याची सर्वाधिक बोली, त्याला वाटप, हा निकष डावलून २००९ ते २०१३ या काळात भूखंडांचे वाटप करण्यात आले़ जाहिरात न देताच हा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यावर महामंडळाने चौकशी समितीही नियुक्त केली़ त्यात बेकायदा भूखंड वाटप प्रकरणात अनेक अधिकारी, कर्मचारी आणि उद्योजकांचे हात गुंतल्याचा आरोप होता़ समितीने भूखंड बेकायदा ठरविल्यानंतर उद्योजकांनी तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेवून भूखंड नियमित करण्याची मागणी केली होती़ राणे यांनी २९ मे २०१३ रोजी १७ टक्के दंड आकारून भूखंड नियमित करण्याचे आदेश जारी केले होते़ मात्र ते आता वादाच्या भोवऱ्यात अडकले असून, उद्योजकांसह अधिकारीही अडचणीत आले आहेत़