शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

रावसाहेब दानवेंच्या मुलाचा शाही विवाहसोहळा

By admin | Published: March 03, 2017 9:45 AM

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलगा संतोष दानवे यांच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 3 - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलगा संतोष दानवे यांच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या शाहीविवाहसोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत अनेक दिग्गज उपस्थित होते. दानवेंनी मुलाच्या लग्नासाठी बीड बायपास रोडजवळील जवळपास 5 ते 6 एकर जमिनीवर अलिशान शामियाना उभारला होता. विशेष म्हणजे हा शामियाना उभारण्यासाठी राजस्थानमधील कारागिरांना बोलावण्यात आले होते. 
 
या लग्नात जवळपास 1 ते 1.50 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय, पाहुण्यांसाठी 30 ते 40  प्रकारचे पदार्थही बनवण्यात आले होते. भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोरवळकर यांनी सांगितले की, विवाहसोहळ्यात जवळपास 30 हजारहून अधिक लोकं सहभागी झाले होते. 
(स्वबळावरील सत्तेसाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू!)
 
या शाही विवाहसोहळ्यातील पाहुण्यांच्या यादीत राज्यातील व्हीव्हीआयपी, सरकारी अधिका-यांपासून ते औरंगबाद-जालना जिल्ह्यातील लोकांचाही सहभाग होता. या लग्नासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तैनात करण्यात आलेले पोलीस पथक ड्रोनच्या सहाय्याने लग्नस्थळावर नजर ठेऊन होते. 
(स्टिंग ऑपरेशनद्वारे व्यथा मांडणा-या बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळल्याने खळबळ)
 
दरम्यान, दानवे यांच्या मुलाच्या शाही विवाहसोहळ्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लग्नासाठी झालेल्या खर्चावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  जवळपास 5 ते 7  कोटी रुपये इतका खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. जालना शहरात लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना या लग्नासाठी दोन दिवसात 400 ते 500 टँकर पाणी रस्त्यांवर फवारण्यासाठी वापरण्यात आल्याचेही बोलले जात आहे. 
 
दरम्यान, या लग्नाकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासहीत पक्षातील बड्या नेत्यांनी पाठ फिरवली. केवळ शिवसेनेचे दोन स्थानिक नेत्यांनी लग्नात हजेरी लावली.