शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
2
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
5
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
6
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
7
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
8
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
9
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
10
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
11
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
12
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
13
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
14
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
15
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
16
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

रेल्वेमध्ये ‘रेडी टू इट’ पदार्थ

By admin | Published: July 18, 2016 4:59 AM

मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम)‘रेडी टू इट’खाद्यपदार्थ देणारी सेवा सुरू केली

मुंबई : मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम)‘रेडी टू इट’खाद्यपदार्थ देणारी सेवा सुरू केली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान खाद्यपदार्थांचे पाकीट प्रवाशांना मिळेल आणि ते प्रवाशांसमोरच उकळत्या पाण्यात पाच मिनिटे ठेवून त्यांच्यासमोरच उघडले जाईल. प्रथम गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली असून, अन्य ट्रेनमध्ये सेवा लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली. आयआरसीटीसीकडून या पूर्वीच खाद्यपदार्थांची सेवा देणारी ‘फूड आॅन ट्रॅक’नावाने ई-कॅटरिंग सेवा सुरू केली आहे. ट्रेनमध्ये आवडते खाद्यपदार्थ मिळवण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटद्वारे, तसेच १८00१0३४१३९ किंवा १३९ वर एसएमएस पाठवून सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येत आहे. २0१६ मध्ये जून महिन्यापर्यंत २२ हजार ४११ जणांनी जेवणाची आॅर्डर दिली आणि एकूण ४५ हजार ९५५ साठी जेवण देण्यात आले. प्रत्येक दिवशी सरासरी २४९ जेवणाच्या आॅर्डर येत आहेत. रेल्वेच्या देशभरातील सगळ्या झोनमधून एकूण १ लाख १३ हजार ८८४ आॅर्डर आल्या आहेत. असे असतानाच आयआरसीटीसीकडून ‘रेडी टू इट’नावाने आणखी एक खाद्यपदार्थ पुरवणारी सेवा सुरू करण्यात आली आहे. जूनअखेरीस आयआरसीटीसीने म्हैसूर येथील डिफेन्स फूट रिसर्च लॅबोरेटरीसह करार केला असून, त्यानुसार आरोग्यदायक पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान रेल्वेतील खाद्यपदार्थांसाठी वापरता येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. रेडी टू इटद्वारे प्रवाशांना बंद पाकिटातून खाद्यपदार्थ दिले जातील. खाद्यपदार्थांतील घटकांची पोषणमूल्ये अबाधित ठेवून नवीन तंत्रज्ञानानुसार ते पदार्थ गोठवण्यात आलेले असल्याने, बंद पाकिटांसह पदार्थ उकळत्या पाण्यात पाच मिनिटे ठेवावी लागतील आणि त्यानंतरच ते पाकिटातून बाहेर काढून प्रवाशांना खावे लागतील. यामुळे पदार्थाचा दर्जा चांगला राहील आणि आरोग्याला हानीही पोहोचू शकणार नाही, असा दावा आयआरसीटसीकडून करण्यात आला आहे. त्यानुसार, शाकाहारी बिर्याणी, राजमा-भात आणि डाळ-भात प्रवाशांना मिळेल.>प्रवाशांनी मागणी केलेले बंद पाकिटातील जेवण हे १५0 ग्रॅम ते ३00 ग्रॅमपर्यंत मिळेल. त्याची किंमत ही ४0 रुपये एवढी असेल. हे पाकीट प्रवाशांसमोरच उकळत्या पाण्यात ठेवले जाईल आणि त्यांच्यासमोरच ते उघडले जाणार आहे. त्यामुळे रेल्वेला पॅन्ट्री डबा जोडण्याचीही गरज लागणार नाही.