शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

आमच्यामुळेच पाकिस्तानी कलाकारांची घरवापसी - मनसे

By admin | Published: September 28, 2016 12:30 PM

सर्व पाकिस्तानी कलाकार ४८ तासांत भारत सोडून गेले असून मनसेच्या इतर आंदोलनांप्रमाणेच हे आंदोलन यशस्वी झाल्याचे मनसे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी स्पष्ट केले.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ -  आमच्या इशा-यानंतर सर्व पाकिस्तानी कलाकार ४८ तासांत भारत सोडून गेले असून मनसेच्या इतर आंदोलनांप्रमाणेच हे आंदोलन यशस्वी झाल्याचे मनसे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी स्पष्ट केले. 
उरी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडून जाण्यास सांगितले होते. '  येत्या ४८ तासांत भारत सोडून पाकिस्तानात परत जा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने हुसकावून लावू' असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला होता. त्यानंतर सर्व बाजूने पाकिस्तानी कलाकारांविरोधातील वातावरण तापू लागले होते. अखेर आठवड्याभरानंतर एकही पाकिस्तानी कलाकार भारतात नसून दिग्दर्शक करण जोहरच्या ' ए दिल है मुश्किल' चित्रपटात प्रमुख भूमिका करणारा फवाद खानही गुपचुपरित्या भारतातून पळ काढल्याचे वृत्त समोर आले आहे. 
(मनसेच्या धमकीनंतर फवाद खानची भारतातून 'कलटी'?)
(पाकिस्तानी कलाकारांनो, ४८ तासांत भारत सोडा, नाहीतर... - मनसे)
(मोदी आता तरी पाकिस्तानला उत्तर द्या - उद्धव ठाकरे)
  •  
 
हे सर्व मनसेच्या आंदोलनाचे यश आहे. मनसेची आंदोलने नेहमीच तडीस जातात. त्याप्रमाणे हेही आंदोलन यशस्वी झाले, असे खोपकर यांनी सांगितले. मनसेचे कोणत्याही कलाकाराला वैयक्तिक विरोध वा भांडण नाही. मात्र पाकिस्तानकडून भारतावर सतत होणारे हल्ले व त्यात जाणारे जवानांचे बळी आता सहन केले जाणार नाहीत. ज्यावेळी पाकिस्तानकडून होणारे हल्ले थांबतील तेव्हा आम्ही नक्कीच त्या कलाकारांचे स्वागत करू, मात्र  तोपर्यंत  कलाकारांना विरोध कायम राहील, असेही खोपकर यांनी स्पष्ट केले. 
तसेच कोणताही पाकिस्तानी खेळाडू, गायक वा कॉमेंट्रेटरलाही (समालोचक) भारतात काम करता येणार नाही, असेही मनसेतर्फे नमूद करण्यात आले असून करण जोहरच्या ' ए दिल है मुश्किल'ला विरोध कायम असून तो प्रदर्शित होऊ देणार नसल्याचेही नमूद करण्यात आले.