शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

जप्त केलेला माल साठेबाजांना परत

By admin | Published: January 22, 2016 3:43 AM

राज्य सरकारने साठेबाज व्यापाऱ्यांवर छापे टाकून जप्त केलेल्या डाळ व तेलापैकी ७० टक्के माल त्यांना परत केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे

मुंबई : राज्य सरकारने साठेबाज व्यापाऱ्यांवर छापे टाकून जप्त केलेल्या डाळ व तेलापैकी ७० टक्के माल त्यांना परत केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. त्यामुळे धाडसत्र हा केवळ दिखावा असल्याचे उघड झाले आहे. जप्त केलेल्या साहित्यापैकी ८५ हजार ५४७.७८१ मेट्रीक टन माल परत करण्यामागील कारण काय, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.दिवाळीदरम्यान तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्यानंतर राज्य सरकारने तीन महिन्यांत ५ हजार ५९२ ठिकाणी छापे टाकले. त्यातून ५३९.५० कोटींचा डाळ आणि तेलसाठा जप्त केला होता. गलगली यांनी शासनाकडे साठेबाजाकडून जप्त साठा, किंमत, परत केलेला माल, शिल्लक माल आणि गुन्ह्यांची माहिती मागितली होती. शासनाने ती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर त्यांंनी प्रथम अपील दाखल केले. अपीलानंतर अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे उप सचिव एस. एस. सुपे यांनी गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ७ प्रादेशिक विभागात ५ हजार ५९२ ठिकाणी धाडी घालून गोदामे तपासण्यात आली होती. त्यातून डाळ, तेल आणि तेल बियाणे असा १,२३,०२८.३८९ मेट्रीक टन माल जप्त करण्यात आला. त्यापैकी ८५,५४७.७८१ मेट्रीक टन माल परत करण्यात आला असून ३७,४८०.६०८ मेट्रीक टन शासनाच्या ताब्यात आहे.