शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

राज्यात ८९० डॉक्टरांची भरती; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 04:30 IST

राज्यात सरकारी रुग्णालयात महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा ‘गट अ’मधील विशेषज्ञांची एकूण १ हजार ५९७ पदे मंजूर आहेत.

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून येते. याची दखल घेत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात ८९० डॉक्टरांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागात मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असून याद्वारे अनेक वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यात ८९० पदे भरण्यास सुरुवात झाली असून अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टरांची पदे भरण्यात आल्याची माहिती आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी दिली. राज्यातील आरोग्य केंद्र आणि तेथील डॉक्टरांची संख्या आधीच व्यस्त होती. त्यामुळे सर्वांनाच रुग्णसेवेचा लाभ मिळत नव्हता. ग्रामीण तसेच दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांवर डॉक्टरांची अधिक चणचण जाणवत होती. त्यातून आरोग्य विभागाने डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला. एमबीबीएस तसेच बीएएमएस डॉक्टरांची भरती करण्यास सुरुवात केली आहे. ज्या भागात रस्त्याची सोयही नाही अशा भागातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

राज्यात सरकारी रुग्णालयात महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा ‘गट अ’मधील विशेषज्ञांची एकूण १ हजार ५९७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९५४ पदे भरलेली आहेत. तर, ६४३ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा ‘गट अ’मधील वैद्यकीय अधिकारी आणि ‘आयपीएचएस’अंतर्गत शल्यचिकित्सक, प्रसूती तज्ज्ञ, फिजिशियन आणि बालरोग तज्ज्ञांच्या सेवा पुरविण्यात येणार आहेत. भरती करण्यात आलेले डॉक्टर अस्थायी प्रकारे सेवा करत होते. आता त्यांना कायम करण्यात येईल, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.डॉक्टरांच्या इच्छेप्रमाणे भरती करत आहोत. जेवढी रिक्त पदे आहेत ती पदे भरण्यात येतील. या अस्थायी डॉक्टरांच्या मेरिटप्रमाणे त्यांची भरती करत आहोत. भरती कायमस्वरूपी करण्यात आल्याने डॉक्टरही समाधानाने काम करतील, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीय