शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

"कृषी कायद्यातील सुधारणेमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 6:17 PM

Kishor Tiwari : सुधारणा व उत्पन्न दुप्पट करण्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढविणारे धोरण राबविले जात आहे, असे किशोर तिवारी म्हणाले.

ठळक मुद्दे'नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना कोणताच फायदा होणार नाही'

यवतमाळ : विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या वाढण्यास कृषी कायद्यातील सुधारणा कारणीभूत असल्याचा आरोप वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला.

ज्या कृषी सुधारणा महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी करण्यात आल्या, याचा परिणाम २००६ पासून होत आहे. काँग्रेसचे धोरण भाजपा सरकारनेही राबविले. त्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात माल विकण्याची मुभा, भंडारन क्षमता नियंत्रण समाप्त करणे, कार्पोरेट शेतीचे प्रयोग, खासगी बाजार समितीला मान्यता अशा सुधारणा काँग्रेसच्या काळातच करण्यात आल्या. हेच धोरण २०१५ मध्ये भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविले. मात्र, या सुधारणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट तर सोडाच ते अर्ध्यावर आले. २०१७ व १९ मध्ये शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी द्यावी लागली. सुधारणा व उत्पन्न दुप्पट करण्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढविणारे धोरण राबविले जात आहे, असे किशोर तिवारी म्हणाले.

याचबरोबर,  तथाकथित सुधारणांमुळे उत्पन्नात दुप्पट वाढ होणार नाही, त्यासाठी सरकार जोपर्यंत शेतीचा लागवड खर्च कमी करत नाही, रासायनिक खत, औषधी, शेतीमधील सर्वप्रकारची मजुरी याला अनुदान, शेती मालाला हमी भाव व शेतकऱ्यांच्या दारावर विक्री, जमिनीचे पुनरूज्जीवन, गावात साठवण व्यवस्था, प्रक्रिया व्यवस्था, विपणन व्यवस्था व शेतीला दीर्घकालीन पतपुरवठा किमान पाच वर्षांसाठी देणे गरजेचे आहे. याशिवाय, जागतिक पर्यावरण बदल यावर आधारित पीक विमा व्यवस्था करण्याची गरज आहे. या सर्व सुधारणा शाश्वत स्वरूपात करणे गरजेचे आहे, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले.

सध्याचे शेती संकटात घटणारे उत्पन्न ओळखण्यात अपयश आले आहे. अनुदान मागे घेण्याचा आर्थिक परिणाम, मातीची सुपिकता कमी होत जाणे, पाण्याची पातळी घटणे, लागवडीची वाढती किंमत, शेतकऱ्यांना पिकांना नफा परतावा न मिळणे, वाढ आणि मागणीपेक्षा अतिरिक्त उत्पादन, सदोष आयातीच्या धोरणांमुळे कृषी संकट हे निर्माण झाले आहे. या मानवनिर्मित संकटाचे नियोजन करणे आवश्यक आहे. नव्या सुधारणा कायद्यात याचा कुठलाच विचार केलेला नाही. कोरडवाहू व लहान शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.

विदर्भभर दौरे करणार...नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना कोणताच फायदा होणार नाही. मुळात केंद्रातील आजपर्यंतच्या सरकारचे कृषी धोरणच चुकीच्या दिशेने राबविले जात आहे, हे शेतकऱ्यांना पटवून दिले जाईल. शाश्वत काय ते बघा, शेतीत पैसा कसा आणता येईल याबाबत शेतकऱ्यांमघ्ये जनजागृती केली जाईल, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरी