शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे राज्यपालांचे आवाहन

By admin | Published: July 12, 2017 4:23 AM

जलयुक्त शिवार अभियान सिंचनाची यशकथा ठरली आहे.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जलयुक्त शिवार अभियान सिंचनाची यशकथा ठरली आहे. शेतीला सिंचनाची व्यवस्था होण्यासाठी भविष्यात राज्यातील नदी, तलाव, कालवे या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अभियान हाती घ्यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शेती पुरस्कार २०१४ चा वितरण समारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. पुरस्कारार्थी शेतकरी हे राज्य शासनाचे कृषीदूतच आहेत. त्यांनी राज्यभर दौरे करुन शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगांबाबत मार्गदर्शन करावे असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. राज्य सरकारने ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली असली तरी भविष्यातील लक्ष्य हे कर्जमुक्तीचे आहे, असे ते म्हणाले. भाजीपाला उत्पादकांना देऊन गौरविण्यात येईल, असे कृषी मंत्री फुंडकर यांनी जाहीर केले. यावेळी लोकमतचे वार्ताहर व्ही. एस. कुलकर्णी यांना शेती मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यात कृषी विद्यापीठांपेक्षा शेतकऱ्यांनीच विविध प्रयोग व संशोधन करून उत्पादनात वाढ केल्याचा चिमटा कुलपती असलेल्या राज्यपालांनी यावेळी काढला.