शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 14:13 IST

दोन लाख रुपयांवरील कर्जमुक्तीच्या टप्प्यासाठी प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आश्वासनपूर्ती करण्याकडे वाटचाल केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. त्याचवेळी नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महाविकास आघाडीचे सरकार दिलासा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांच्या पुढे कर्जमुक्ती देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जे शेतकरी कर्जाची  नियमीत परतफेड करतात, त्यांच्यासाठीही काही तरी दिलासा देणारी बाब प्रत्यक्षात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पुण्यात आयोजित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. 

मंदीच्या काळात शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त होत असताना त्यांना कोणी वाली राहिला नाही. शेतकऱ्यांना मजबूत केले पाहिेजे. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही. दोन लाख रुपयांवरील कर्जमुक्तीच्या टप्प्यासाठी प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.