शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

पुनर्वसन करा, नंतर गाळ काढा!

By admin | Published: May 20, 2016 2:28 AM

पवना धरणातील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. धरणातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली

पवनानगर : पवना धरणातील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. धरणातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. त्या वेळी शेतकऱ्यांनी ‘अगोदर पुनर्वसन करा, नंतर गाळ काढा,’ अशी जोरदार मागणी केली. अधिकाऱ्यांशी शाब्दिक वादावादीही झाली. त्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. या प्रश्नी शुक्रवारी बैठक होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास क्षेत्र व हिंजवडी आयटी पार्क या नागरी वस्तीतील भागाला व औद्योगिक क्षेत्राला मावळ तालुक्यातील पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. पवना धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. या कामांची पाहणी खासदार बारणे यांच्यासह तहसीलदार शरद पाटील, पवना जलसिंचन अधिकारी श्री. मटकरी, पवना जलसिंचन शाखाधिकारी मनोहर खाडे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, शरद हुलावळे, अमित कुंभार यांनी केली. (वार्ताहर)>शेतकऱ्यांकडून शासनाचा निषेधगेली चाळीस वर्षे पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन न झाल्याने शेतकरी संतप्त आहेत. लोकसहभागातून गाळ काढला जात आहे, ही माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील शेतकरी गाळ काढण्याच्या ठिकाणी आले. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत गाळ काढू नये, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना केली. काम होऊ देणार नाही, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली. या वेळी आपल्या भावना शासनाला कळवून न्याय दिला जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकरी शांत झाले.$$्रिपुनर्वसनाचा प्रश्नपवना धरणातील सुमारे साडेतीनशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन झाले आहे. मात्र, उर्वरित साडेआठशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. शेतकरी संघटनांनी केलेल्या पाहणीत आता पुनर्वसन शेतकऱ्यांची संख्या बाराशेवर गेली आहे. या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करायलाच हवे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांचे पुनर्वसन मावळ परिसरातच करून प्रत्येकाला एक एकर क्षेत्र द्यावे, तसेच महापालिकेत नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण ठेवावे, अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या.