शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

हटविलेले स्टॉल ग्रामस्थांनी पुन्हा उभारले, ग्रामस्थांचा उद्रेक, अचानक राबविलेल्या मोहिमेबाबत नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 8:41 PM

मुख्य धबधब्याच्या ठिकाणी लावण्यात आलेले स्टॉल सोमवारी रात्री काढून टाकण्यात आले. मात्र, स्टॉलधारक आक्रमक होताच हे स्टॉल पुन्हा नाट्यमयरीत्या उभारण्यात आले. स्टॉल हटविण्याचे काम वनविभागाने केल्याची चर्चा आंबोली परिसरात असून, वनविभागाचे काही अधिकारी मुद्दामहून शांत आंबोली अशांत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. 

आंबोली - येथील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी लावण्यात आलेले स्टॉल सोमवारी रात्री काढून टाकण्यात आले. मात्र, स्टॉलधारक आक्रमक होताच हे स्टॉल पुन्हा नाट्यमयरीत्या उभारण्यात आले. स्टॉल हटविण्याचे काम वनविभागाने केल्याची चर्चा आंबोली परिसरात असून, वनविभागाचे काही अधिकारी मुद्दामहून शांत आंबोली अशांत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.  तसेच रात्री अचानक स्टॉल हटविण्याच्या कृतीबाबतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.आंबोलीतील मुख्य धबधब्यावर गेली कित्येक वर्षे स्थानिक ग्रामस्थांनी स्टॉल उभारले आहेत. पण या स्टॉलधारकांना चार दिवसांपूर्वी अचानक वनविभागाने नोटिसा दिल्या. तर सोमवारी रात्रीच्या सुमारास हे स्टॉल काढून टाकण्यात आले. सुरुवातीला वनविभागाने स्टॉल काढून टाकण्याचे श्रेय घेतले खरे; पण स्टॉलधारकांचा उद्रेक बघून आपण त्यातले नाहीच असा पवित्रा वनविभागाने दिवसभर घेतला होता. स्टॉलधारकांनी स्टॉलसाठी लावलेले बांबूही दरीत फेकून देण्यात आले होते. वनविभागाने रितसर कारवाई करायची सोडून रात्रीच्या वेळी कारवाई केल्याने अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. सोमवारी वनविभागाच्या कार्यालयासमोर आंबोलीतील ग्रामस्थ केशव जाधव यांनी उपोषण केले होते. त्यानंतर वनविभागाने हा निर्णय घेतला होता. हे स्टॉल अनधिकृत आहेत. त्यामुळे स्टॉल हटविणारच, असा पवित्रा वनविभागाने घेतला होता. स्टॉलधारक आपले स्टॉल रात्री आठच्या सुमारास बंद करून जातात. हीच संधी साधत हे स्टॉल हटविले होते. पण मंगळवारी सकाळी स्टॉलधारकांना हे समजले. आपले स्टॉल हटविल्यामुळे स्टॉलधारक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी या विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ पातळीवर याची दखल घेण्यात आली होती. मात्र आचारसंहिता असल्याने सर्व स्टॉलधारक आपल्या आंदोलनाची दिशा ठरवित होते. त्याचवेळी स्टॉलधारकांनी आक्रमक होत पुन्हा स्टॉल उभारण्याचा निर्णय घेतला. कोण आपले स्टॉल हटवते ते बघूया, असे म्हणत हे स्टॉल उभारले. मात्र उशिरापर्यंत वनविभागाचे कोणीही अधिकारी तेथे फिरकले नाहीत.दरम्यान, सोमवारी रात्री स्टॉल हटविले आणि मंगळवारी सायंकाळी स्टॉलधारकांनी पुन्हा स्टॉल उभारल्याने सध्या तरी हा वाद शमला असला तरी पुन्हा केव्हाही उभा राहू शकतो, असे मत आंबोलीतील अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले. तसेच शांत आंबोली नको त्या कारणांनी अशांत बनविली जात असल्याचा आरोपही स्टॉलधारक करीत आहेत.आंबोलीच्या पर्यटनाची बदनामी होतेयसध्या आंबोलीच्या पर्यटनाची या ना त्या कारणाने वनविभाग बदनामी करीत आहे. कधी धबधबा कोणाचा यावरून वाद, तर कधी स्टॉलवरून वाद. यापूर्वी कधीही अशाप्रकारे वाद नव्हते. पण आता हे नव्याने आंबोलीत वाद उभे राहत आहेत. त्यामुळे आंबोलीच्या पर्यटनाची बदनामी करणा-या अधिका-यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.आंबोलीतील स्टॉल हटविण्याचे काम आंबोली वनविभागातील कर्मचा-यांकडून काही वरिष्ठ अधिका-यांनी करून घेतले. पण मंगळवारी ही कारवाई अंगलट येणार असे वाटल्याने अखेर सर्व स्टॉल उभारण्यास परवानगी दिली. तसेच याबाबत सर्वच अधिका-यांनी कानावर हात घेतले. अधिकारी कोणाचे दूरध्वनीही घेण्यास तयार नव्हते.कारवाई करणारसोमवारी रात्री जे स्टॉल हटविले ते वनविभागानेच हटविले आहेत. हे सर्व स्टॉल अनधिकृत होते व वनविभागाच्या जागेत होते. पर्यटनस्थळावर येणा-यांना पार्किंगचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने हे स्टॉल वनविभागाने हटविले आहेत आणि जर पुन्हा या ठिकाणी स्टॉल उभारले गेले असतील तर नियमात राहून कारवाई करण्यात येणार आहे.- संजय कदम, वनक्षेत्रपाल, आंबोली