शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

अपघातग्रस्त मच्छिमारांचे पुनर्वसन करणार

By admin | Published: August 24, 2016 3:12 AM

मासेमारी करतांना नुकसान झाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी २३ आॅगस्ट रोजी झाई येथे केले.

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- समुद्रात काबाडकष्ट करणारा मच्छिमार हा शेतकरी असल्याने मासेमारी करतांना नुकसान झाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी २३ आॅगस्ट रोजी झाई येथे केले. दोन दिवसांपूर्वी समुद्रात दोन बोटींना जलसमाधी मिळाल्याच्या घटनेनंतर सुखरूप परतलेल्या खलाशांच्या कुटुुंबियांना धीर देण्यासाठी खासदार चिंतामण वनगा यांच्यासह झाई येथे आले होते. या वेळी झाईतील मांगेला समाज मच्छिमार सहकारी सोसायटीच्या प्रांगणात स्थानिक मच्छिमार जमले होते. अपघातग्रस्त दोन्ही बोटींचेमालक आणि स्वबळावर किनाऱ्यापर्यंत पोहचणाऱ्या खलाशांची पालकमंत्री विष्णू सवरा आणि खासदार चिंतामण वनगा यांनी विचारपूस करून साहसाचे कौतुक केले. अशोक अंभिरे यांनी मच्छिमारांचे प्रश्न मांडले. मच्छिमारांचे पुनर्वसन, लाईफजॅकेट, बोटीत सौरदिवे, इन्व्हर्टर, मासेमारी करतांना अपघात घडल्यास दोन ऐवजी चार लाख नुकसानभरपाई आदी मागण्या मांडण्यात आल्या. शिवाय दोन्ही बोटींच्या मालकांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मच्छिमारांच्या विम्याची रक्कम भरण्यासह नवीन बोटींची प्रकरण करण्यास प्राधान्य देणार असल्याचे खासदार चिंतामण वनगांनी सांगितले. या दुर्घटनेची सखोल माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांना दिली आहे. पीडित बोटमालक आणि खलाशांच्या रोजगार आणि पुनर्वसनाची जबाबदारी घेण्याची हमी शासनाच्या वतीने आपण घेत असल्याचे आश्वासन सवरा यांनी दिले. गुजरातने मच्छिमारांना दिलेल्या सुविधा, महाराष्ट्रातील मच्छिमारांना मिळाव्यात म्हणून प्रयत्न करणार आहे. खलाशांनी मोबाईलद्वारे संपर्क साधूनही त्यांना मदत न पुरविणाऱ्या तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी करणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी लोकमतला दिली. या वेळी जि. प. सभापती धर्मा गोवारी, डहाणू उप विभागीय दंडाधिकारी अंजली भोसले, डहाणू व तलासरी तहसिलदार, झाई सरपंच जनी सांबर, पंचायत समिति सदस्य प्रकाश सांबर, मिच्छमार नेते नरेंद्र पाटील, राजेंद्र मेहेर आणि स्थानिक मच्छिमार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.