शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तीची पुन:प्रतिष्ठापना होणार

By admin | Published: April 12, 2015 1:05 AM

शिवपत्नी सतीचे नेत्र ज्या ठिकाणी पडले, त्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्ती पुन:प्रतिष्ठापनेला येत्या सप्टेंबरमध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत.

इंदुमती गणेश ल्ल कोल्हापूरशिवपत्नी सतीचे नेत्र ज्या ठिकाणी पडले, त्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्ती पुन:प्रतिष्ठापनेला येत्या सप्टेंबरमध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. देवीचा हा त्रिशताब्दी उत्सव वर्षभर भव्य-दिव्य प्रमाणात साजरा व्हावा, यासाठी ‘श्री अंबाबाई मूर्ती पुन:प्रतिष्ठापना त्रिशताब्दी महोत्सव समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. मात्र याला शासनाकडून भक्कम आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे.अंबाबाईची मूर्ती मंदिरात पुन:प्रतिष्ठापित केली, त्या घटनेला २६ सप्टेंबर २०१५ रोजी ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळेच कोल्हापुरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा उत्सव नियोजनबद्ध होण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, धार्मिक संस्था, श्रीपूजक आणि लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. याअंतर्गत इतिहास परिषद, यज्ञ-होमहवन, भजन-कीर्तन महोत्सव तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नांदेड येथील ‘गुरुदा गद्दी’ला ३०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भरघोस निधी मिळून या शहराचा कायापालट करण्यात आला. तुळजापूर, पंढरपूरसह अक्कलकोटसारख्या लहान-मोठ्या तीर्थक्षेत्रांचा विकास झपाट्याने झाला; पण गेली चार वर्षे अंबाबाई मंदिराचा विकास कागदोपत्री आराखड्यांपुढे गेलाच नाही. मात्र मंदिराची प्राचीन महती आणि ३०० वर्षे पूर्तीचा संदर्भ देऊन भरघोस निधी आणण्यासाठी पुढाकाराची गरज आहे. हा त्रिशताब्दी सोहळा आणि मंदिराचा विकास केला, तरच या क्षेत्राचा धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून जगभरात नावलौकिक पोहोचणार आहे. आदिलशाहीच्या काळात मंदिरावरील आक्रमणांपासून मूर्ती वाचविण्यासाठी १२ ते १६व्या शतकाच्या दरम्यान ती एका पुजाऱ्याच्या घरात सुरक्षित ठेवण्यात आली. ही मूर्ती पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात यावी, असा दृष्टान्त नरहरभट सावगावकर यांना अंबाबाईने दिला. त्यांनी ही गोष्ट महाराणी ताराराणी यांचे सुपुत्र शंभुराजे छत्रपती यांना सांगितली. शंभुराजेंनी सरदार हिंदुराव घोरपडे यांना मूर्तीच्या पुन:प्रतिष्ठापनेची आज्ञा केली. त्यानुसार अश्विन शुद्ध दशमी शके १६३७, राज्याभिषेक शक ५०, दिनांक २६ सप्टेंबर १७१५ रोजी मूर्तीची मंदिरात पुन:प्रतिष्ठापना करण्यात आली. ग.ह. खरे यांच्या महाराष्ट्रातील ४ दैवते, मूर्तिविज्ञान, करवीर सरदारांच्या कैफियती या ग्रंथांमध्ये हा उल्लेख आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई ही आदिशक्तीचे स्वरूप आहे. ती शाक्त सांप्रदायातील देवता आहे. प्रत्येक राजवटीच्या काळात मंदिरात सुधारणा होत आताचे अंबाबाई मंदिराचे बदललेले स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. ‘जो लवाजमा आम्हाला आहे, त्यापेक्षा काकणभर सरस करून देवीला द्या,’ अशी आज्ञापत्रे शाहू महाराजांनी काढली व रोषण नाईक, भालदार-चोपदार, सरदार, तोफेकरी, घोडेस्वार असा लवाजमा देवीच्या चरणी वाहिला.