शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

अल्पभूधारकांची अट शिथिल करा - रामदास आठवले

By admin | Published: June 12, 2017 1:42 AM

राज्य शासन शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा विचार करत आहे, पण यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांची घातलेली अट

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य शासन शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा विचार करत आहे, पण यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांची घातलेली अट शिथिल करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केले. केंद्र शासनाच्या तीन वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. आठवले म्हणाले, की कर्जमाफीसाठी सध्या राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, ही आरपीआय आणि भाजपा दोघांची भूमिका आहे. परंतु त्यासाठी ३० ते ४० हजार कोटी रुपये आणायचे कोठून, हा मोठा प्रश्न आहे. भाजपा सरकार दलितांचे आरक्षण रद्द करणार आहे, संविधान बदलणार असा खोडसाळ प्रचार काही मंडळी करत असल्याचे सांगून आठवले म्हणाले, ‘‘देशाचे पंतप्रधान संविधानाला धर्मगं्रथ मानत असून, ते बदलले जाणार नाही आणि आरक्षणालाही कोणताच धोका नाही. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर हल्ले केले जात आहेत. त्यांना जास्त खुमखुमी असेल तर त्यांना धडा शिकवावा लागेल. एकदाच आरपारची लढाई होऊन जाऊ द्या. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे अशी मागणी करतानाच आमचे धोरण युद्धाकडे नाही तर बुद्धाकडे जाणारे आहे. मात्र वेळ आली तर चोख उत्तर देण्यात येईल.’’मराठी माणूस राष्ट्रपती झाला तर आम्हाला आनंदच वाटेल. शरद पवार यांना राष्ट्रपती व्हायचे असेल तर विरोधात राहून ते शक्य नाही. त्यांनी एनडीएमध्ये यावे, अजून आमचा उमेदवार ठरलेला नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले.