शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

दिलासा : दाखल्यांसाठी आता १० जुलैची मुदत, सर्व्हरची क्षमता वाढविण्याचा निर्णय

By दीपक भातुसे | Published: July 01, 2023 9:03 AM

Mumbai: राज्यात लाखो विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू असताना महाऑनलाइन संकेतस्थळावर, तसेच सेतू केंद्रावर सर्व्हरच्या गोंधळामुळे दाखले मिळेनासे झाले आहेत. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकार दाखले सादर करण्याची मुदत १० जुलैपर्यंत वाढविणार आहे.

- दीपक भातुसे मुंबई : राज्यात लाखो विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू असताना महाऑनलाइन संकेतस्थळावर, तसेच सेतू केंद्रावर सर्व्हरच्या गोंधळामुळे दाखले मिळेनासे झाले आहेत. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकार दाखले सादर करण्याची मुदत १० जुलैपर्यंत वाढविणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांत सर्व्हरची क्षमता वाढवून ही अडचणही दूर केली जाणार असल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

केवळ विद्यार्थीच नव्हे, तर विविध कामांसाठी राज्यातील जनतेला विविध दाखल्यांची गरज लागते. मात्र, सध्या तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन, तसेच सेतू केंद्रावर दाखले मिळण्यास प्रचंड विलंब लागत आहे. यात निवासाचा दाखला, जातप्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला अशा विविध दाखल्यांचा समावेश आहे. दाखले मिळत नसल्याने महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी हुकते की काय, अशी विशेषतः आरक्षित जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होती. 'लोकमत'ने ही अडचण समोर आणली होती. त्याची दखल सरकारने घेतली आहे.

अर्जांची संख्या वाढली- सर्व्हर गती मंदावल्याने दाखले विलंबाने मिळत आहेत. पूर्वी ३० सेकंद ते १ मिनिटाला एक दाखला काढणे शक्य होते.- मात्र, अर्जांची संख्या प्रचंड वाढल्याने सर्व्हरवर ताण येतो आहे. त्यामुळे एक दाखला काढायला ५ ते ६ मिनिटे लागत आहेत.- एका सेतू केंद्रावर साधारणतः १५ ते २० हजार अर्ज येतात. मात्र, सध्या काही सेतू केंद्रांवर हा आकडा ५० ते ६० हजारांच्या घरात गेला आहे.-मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून सर्व्हरची गती मंदावल्याच्या तक्रारी आहेत. विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्याची आम्ही सर्व्हरची संख्या वाढवत आहोत. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर अर्जाचा निपटारा जलद गतीने होऊ शकेल. -पराग जैन, प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र