शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
2
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
4
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
5
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
6
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
7
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
8
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
9
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
10
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
11
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
12
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
13
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
14
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
15
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
17
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
18
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
19
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
20
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?

छत्रपती उदयनराजे राज्यपालांवर संतापले,"२८ तारखेपर्यंत..."; भाजपाला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 1:59 PM

आज संपूर्ण जगात, वेगवेगळ्या देशात अनेक योद्धे, राजे होऊन गेले. त्यांच्यात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात एक फरक आहे असं उदयनराजे म्हणाले.

पुणे - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून छत्रपती उदयनराजे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. राज्यपाल हे सन्मानाचं पद आहे. त्यांना जबाबदारी कळत नसेल तर त्यांना त्या पदावर बसण्याची आवश्यकता नाही. शिवभक्त म्हणून मी परखड मत मांडले आहे. मी याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटणार आहे. सगळ्या नेत्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. २८ तारखेपर्यंत राज्यपालांवर काय कारवाई करतात ते पाहू असा सूचक इशाराच उदयनराजेंनी भाजपाला दिला आहे. 

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या तोंडून शिवरायांबद्दल जे वाक्य ऐकलं त्यानंतर क्षणभर मला काहीच कळालं नाही. राज्यपालांनी हे वक्तव्य केले त्याला आधार काय? आज छत्रपतींचे विचार जुने झाले असं ते म्हणतात. मग ज्यावेळेस संपूर्ण देशभरात अनेक राजे मुघलसाम्राज्यासमोर शरण गेले. त्यावेळी एकमेव छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी विरोध केला होता. हा विरोध स्वत:च्या स्वार्थासाठी नव्हता तर लोकांना न्याय देण्यासाठी सन्मान मिळवून देण्यासाठी होता. हा विचार उराशी बाळगून संपूर्ण आयुष्य ज्यांनी वेचले त्यांच्याविषयी असतं बोलतात असं त्यांनी सांगितले. 

तसेच सुधांशू त्रिवेदीची बुद्धी भ्रष्ट झालीय का? एवढ्या मोठ्या मुघल साम्राज्याविरोधात सगळे शरण जात होते तेव्हा छत्रपती शिवराय त्यांच्याविरोधात उभे राहिले. अशी विधानं करताना लाज वाटत नाही का? कशाचा आधार घेऊन बोलताय. वंशज म्हणून आहे पण त्याआधी शिवभक्त म्हणून मी माझे मत मांडतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा सोडून चालणार नाही. शिवरायांनी देशातील प्रत्येक नागरिकाला कुटुंब म्हणून मानलं. आज काय परिस्थिती आहे? लोकशाहीची संकल्पना शिवरायांनी त्याकाळी मांडली. जगात कुठल्या राजाने लोकशाहीचं संकल्पना मांडली? रयतेचं राज्य असं शिवाजी महाराजांच्या राज्याचा उल्लेख होतो. मी खासदार नंतर आधी शिवभक्त, पक्ष वैगेरे नंतर पाहू. मी तडजोडीचं राजकारण करत नाही. शिवरायांच्या मुद्द्यावर अजिबात माघार नाही. २८ तारखेला पुन्हा भेटू. याबाबत काय होतंय ते पाहू असं उदयनराजेंनी स्पष्ट केले. 

महापुरुषांचे स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराजआज संपूर्ण जगात, वेगवेगळ्या देशात अनेक योद्धे, राजे होऊन गेले. त्यांच्यात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात एक फरक आहे तो म्हणजे इतरांनी त्यांचे राज्य वाढवण्यासाठी लढाई केली. तर छत्रपतींनी सर्वसामान्य लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लढाई केली. छत्रपतींचं नाव घेतलं तरी अंगात ताकद निर्माण होते. बारकाईनं आपण विचार केला तर त्यावेळेस सुद्धा एक दुरदृष्टी विचार शिवरायांनी मांडला. भगतसिंग, क्रांतीसिंह नाना पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज होते असंही उदयनराजे म्हणाले. 

सर्वधर्मसमभाव हा विचार छत्रपतींनी मांडलासर्वधर्म समभाव, स्वराज्याची संकल्पना हा विचार त्यावेळी छत्रपतींनी मांडला. प्रत्येक जाती धर्मातील लोकांचा शिवरायांनी सन्मान केला. महिला, मुले वडीलधारी लोकांचा सन्मान केला. इतिहास पाहिला तर त्यातून बरेच काही घेण्यासारखं आहे. या वक्तव्याने चीड, राग येतो. या संपूर्ण जगात सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारत देश आहे. या भारतात विविध जातीधर्मातील लोकांचे वास्तव्य आहे. या सगळ्यांना एकत्र ठेवायचा असेल तर सर्वधर्मसमभाव हा विचार छत्रपतींनी मांडला. त्याच विचाराच्या आधारावर देश अखंड राहू शकतो असं उदयनराजेंनी सांगितले. 

...असं धाडस निर्लज्ज लोक करू शकतातमी पणा शिवरायांच्या काळात नव्हता. आज मी पणा वाढलाय. व्यक्ती केंद्रीत झालं आहे. छत्रपतींचे नाव देणे, पुतळे उभारणं हा सन्मान आहे पण त्यांचे विचार आचरणात आणणार की नाही? देव कोणी पाहिला नाही पण देवाच्या रुपाने एक युगपुरुष जन्माला येतो ते छत्रपती. अशा राजाची अवहेलना केली जाते. छत्रपतींचा अवमान करण्याचं धाडस निर्लज्ज लोक करतात. छत्रपतींचा विसर कसा पडू शकतो असं उदयनराजेंनी विचारलं. राज्यपालांच्या विधानाचा राग सर्वसामान्य लोकांना आलाय. नितीन गडकरी, शरद पवार हे त्या व्यासपीठावर होते. राज्यपालांच्या विधानाचा विरोध व्यासपीठावर करायला हवा होता असंही म्हटलं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपा