शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

आरक्षण बंद करणार नाही

By admin | Published: October 12, 2015 5:41 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील दलित, शोषित आणि उपेक्षितांना आरक्षणाच्या रूपाने दिलेली ताकद आमचे सरकार कदापि रोखणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील दलित, शोषित आणि उपेक्षितांना आरक्षणाच्या रूपाने दिलेली ताकद आमचे सरकार कदापि रोखणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार करण्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून बराच गदारोळ उठला होता. बिहार विधानसभा निवडणुकीतही विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरल्याने मोदी यांचे वक्तव्य याचसंदर्भात असल्याचे मानले जात आहे. दादर येथील इंदू मिलच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे आणि दहिसर ते डी.एन. नगर व दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) या मार्गावरील मेट्रो रेल्वेचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला. तत्पूर्वी जेएनपीटी येथील पोर्ट उभारणीच्या कामाचा प्रारंभही त्यांनी केला. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार, सामाजिक न्याय मंत्री विजय सांपला तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे, समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, खा. रामदास आठवले आदी मान्यवर उपस्थित होते. वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या जाहीर सभेत बोलताना मोदी म्हणाले, इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक आमच्या हातून होणे, हे भाग्यलिखित असावे. आमच्या अगोदरही सरकार होते. पण त्यांना जी गोष्ट जमली नाही ती आम्ही अवघ्या काही दिवसात करून दाखवली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गंगवार यांनी तातडीने इंदू मिलची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून दिली. त्यामुळे हे शक्य झाले. या जगावर जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार यात शंका नाही. आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले, केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना व आताही दलित, उपेक्षितांना मिळणारे आरक्षण बंद होणार, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. तशा टोळ््याही कार्यरत आहेत. वास्तविक, डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाकरिता इंदू मिलची जमीन तातडीने देऊन, संसदेत डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र बसवून भाजपानेच बाबासाहेबांबद्दलच्या निष्ठांचे दर्शन घडवले आहे. त्यामुळेच दलित, इतर मागासवर्गीय, आदिवासी यांची संख्या सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब आदी राज्यांमध्ये या घडीला भाजपाची सत्ता आहे. डॉ. आंबेडकर यांनी दिलेली आरक्षणाची ताकद कोणीही रोखू शकत नाही. आपण स्वत: गरीबी पाहिली असून डॉ. आंबेडकर नसते तर माझ्यासारखा सामान्य घरातील व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचू शकला नसता.डॉ. आंबेडकर यांना आपण दूरदृष्टीच्या अभावी केवळ दलितांचे नेते बनवले तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल, अशा शब्दात मोदींनी आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे विश्वातील दलित, शोषित, पिडीतांचे नेते आहेत. शोषितांच्या संघर्षाचा विषय निघाला की, मार्टीन ल्युथर किंग यांचे नाव घेतले जाते. त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकर यांचे नाव जगभर घेतले गेले पाहिजे. डॉ. आंबेडकर यांनी आयुष्यभर उपेक्षेचे विष पचवले. मात्र जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी कधीच कुटुतेचे दर्शन घडवले नाही. त्यामुळे त्यांचे विचार जगभर पोहोचविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही मोदींनी दिली.(विशेष प्रतिनिधी)