शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

राज्यातील १२ लाख टन साखरेचा होणार राखीव साठा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 10:56 AM

गेली २ वर्षे देशात विक्रमी ३३०-३३५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

ठळक मुद्देसाखर उद्योगाला दिलासा : तरीही देशात शंभर लाख टन साखर राहील शिल्लकदेशातील साखरेचे उत्पादन ३३० वरून २८५ लाख टनांवर घसरण्याचा अंदाजदेशात सुमारे १०० लाख टन साखर पुढील हंगामातही शिल्लक राहणार

पुणे : केद्र सरकारने जाहीर केलेल्या राखीव साठा (बफर स्टॉक) योजनेमुळे राज्यातील साखर कारखान्यांना १२ लाख टन साखरेचा साठा करता येणार आहे. या साखरेचे व्याज, विमा आणि गोदामाच्या खर्चापोटी कराव्या लागणाऱ्या खर्चाचा परतावा कारखान्यांना केंद्र सरकारकडे मागता येईल. त्यामुळे राज्यातील साखर कारखानदारीला काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र, तरीही देशात १०० लाख टन साखर ऑक्टोबर २०२०मधे शिल्लक राहण्याची दाट शक्यता आहे. गेली २ वर्षे देशात विक्रमी ३३०-३३५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१८मधे नवीन हंगाम सुरू होताना तब्बल १०४ लाख टन साखरेचा साठा शिल्लक होता. मे महिन्यात संपलेल्या हंगामातही (२०१८-१९) देशात ३३० आणि राज्यात सलग दुसऱ्या वर्षी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. देशाचा वार्षिक खप साधारण २६० लाख टन इतका असून, राज्यात ३० ते ३५ लाख टन साखर खपते. यंदाच्या वर्षी १३९ ते १४० लाख टन साखर क्टोबरअखेरीस शिलकी राहील. साखरेला उठाव नसल्याने साखर उद्योगासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी साखरेचा बफर स्टॉक करण्याची मागणी साखर संघटनांकडून होत होती. शिल्लक साखरेच्या प्रश्नामुळे देशात १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जुलै २०२०पर्यंत ४० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. साधारण त्यातील ३० टक्के वाटा राज्याला मिळेल. म्हणजेच राज्याच्या वाट्याला येणारी १२ लाख टन साखर प्रत्येक कारखान्याला वाटून दिली जाईल. वाट्याला येणारा साखरेचा कोटा कारखान्यांना बाजूला काढावा लागेल. या साखरेच्या प्रमाणात विमा, कर्जाचे व्याज यांचा परतावा केंद्र सरकारकडून मिळेल. त्यासाठी दर ३ महिन्यांनी कारखान्यांना परताव्यासाठी अर्ज करावा लागेल. 

......* देशातील साखरेचे उत्पादन घसणार?‘गेल्या वर्षी असलेला बफर स्टॉकचा कोटा ३० वरून ४० लाख टनांवर वाढविण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक बाजारातील दरात सुधारणा होईल. शेतकऱ्यांनादेखील ऊसबिलाची रक्कम देता येणे कारखान्यांना शक्य होईल. उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात २०१८-१९ या वर्षांत भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे २०१९-२० या हंगामामधे मागील वाढीव दर कायम करण्याचा केंद्राचा निर्णय अपेक्षित होता,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली. .......... आगामी ऊस गाळप हंगामामधे देशातील साखरेचे उत्पादन ३३० वरून २८५ लाख टनांवर घसरण्याचा अंदाज आहे. गेल्या मॉन्सूनमधे महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरविल्याने ऊस क्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरून ८.२३ लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील साखरेचे उत्पादन १०७ वरून ७० लाख टनांपर्यंत खाली घसरेल. त्याचा फटका देशातील एकूण उत्पादनाला बसेल. गेल्या हंगामातील (२०१८-१९) १३९ ते १४० लाख टन साखर शिल्लक राहील. देशातील साखरेचा खप २०६ लाख टन असून, ६० ते ६५ लाख टन साखर  आगामी हंगामात निर्यात होईल. ही आकडेवारी लक्षात घेतल्यास देशात सुमारे १०० लाख टन साखर पुढील हंगामातही शिल्लक राहील.........

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारFarmerशेतकरीbusinessव्यवसाय