शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

मेट्रो-३ ला दिलासा

By admin | Published: May 19, 2017 12:09 AM

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ साठी केल्या जाणाऱ्या झाडांच्या कत्तलीवर घातलेली बंदी उठवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय योग्य आहे, असे

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ साठी केल्या जाणाऱ्या झाडांच्या कत्तलीवर घातलेली बंदी उठवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय योग्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. परिणामी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिलासा मिळाला असून, मेट्रो-३ चा मार्ग मोकळा झाला आहे.मेट्रो-३ प्रकल्पामुळे सुमारे ५ हजार झाडांची कत्तल होणार असल्याने चर्चगेट व कफ परेड येथील रहिवाशांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने सुरुवातीला झाडांच्या कत्तलीला स्थगिती दिली. मात्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वकिलांनी हा प्रकल्प कसा जनहिताचा आहे आणि मुंबईकरांसाठी किती महत्त्वाचा आहे, हे पटवून दिल्यानंतर उच्च न्यायालयाने ५ मे रोजी झाडांच्या कत्तलीवर दिलेली स्थगिती हटवली. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा बराच त्रास कमी होणार असून वाहतूककोंडीसारखा गंभीर प्रश्नही सुटणार आहे. पर्यावरणाचे जतन आणि विकासकामे यांमध्ये समन्वय साधण्याची आवश्यकता असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. मात्र नीना वर्मा यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा झाडांच्या कत्तलीवरील स्थगिती हटवण्याचा निर्णय योग्यच असल्याचे म्हणत मेट्रो-३ ला प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयामुळे कॉर्पोरेशनला मोठा दिलासा मिळाला आहे.- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पर्यावरणावर यापूर्वीच ‘उतारा’ शोधून काढला आहे. कॉर्पोरेशनद्वारे ‘प्रकल्प परिसर’ या हरित उपक्रमांतर्गत कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील प्रस्तावित २७ स्थानकांच्या परिसरातील विविध गृहनिर्माण संस्था, शाळा आणि रुग्णालयांमध्ये २५ हजारांहून अधिक वृक्षांच्या रोपांचे वाटप केले जात आहे.- मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाप्रमाणे मेट्रो-३ च्या प्रस्तावित २७ स्थानकांवर एकूण ३ हजार ८९१ झाडे आहेत. त्यापैकी १ हजार ७४ झाडे कापण्यास तर १ हजार ७२७ झाडांचे पुनर्रोपण करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.- वृक्ष प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार प्रत्येक कापल्या जाणाऱ्या झाडामागे ३ झाडे लावणे बंधनकारक असते. त्याप्रमाणे तोडल्या जाणाऱ्या झाडांची भरपाई म्हणून कॉर्पोरेशन ३ हजार झाडे लावणार आहे.- मेट्रो-३ प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर जवळपास ६ हजार ८०० टन कार्बनडाय आॅक्साइड तसेच इतर हरित गृह वायूंचे प्रमाण कमी होईल, असा दावा केला जात आहे.- मेट्रो-३ या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पामुळे दररोज जवळपास ६.५ लाख वाहनांच्या फेऱ्या कमी होतील.- विमानतळांना जोडण्याकरिता साधारणत: स्वतंत्र मेट्रो वाहिन्या असतात. मात्र मेट्रो-३ विमानतळासह मुंबईतील बीकेसी, दादर, वरळी, महालक्ष्मी, चर्चगेट या प्रमुख केंद्रांना जोडणारा एकमेव मार्ग ठरणार आहे.