शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

किल्ले रायगडचे गतवैभव परत आणणार

By admin | Published: April 12, 2017 1:38 AM

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरू होते. पारदर्शक कारभार कसा असावा हे छत्रपतींनी सुराज्य करून दाखवून दिले. छत्रपती शिवरायांची राजधानी

महाड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरू होते. पारदर्शक कारभार कसा असावा हे छत्रपतींनी सुराज्य करून दाखवून दिले. छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पुनर्निर्माणाचे शल्य आजवर तमाम शिवभक्तांना सतत बोचत होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने रायगड किल्ल्याचे काम मार्गी लावले आहे. या रायगडाच्या पुनर्निर्माणाचे शिवधनुष्य हे केवळ शासनाने पेलायचे नसून, हे तुम्हा आम्हा सर्वांच्या सहकार्यातून करायचे आहे. या शिवपुण्यतिथीनिमित्ताने किल्ले रायगडचे गतवैभव पुन्हा आणण्याचा संकल्प करू या, असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समितीतर्फे रायगडावर ३३७ वी शिवपुण्यतिथी मंगळवारी साजरी करण्यात आली. त्यावेळी राजदरबार सभागृहात संपन्न झालेल्या अभिवादन सभेत चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमाला अभिनेते राहुल सोलापूरकर, आ. भरत गोगावले, आ. प्रशांत ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, वीरबाजी पासलकर यांचे वंशज लक्ष्मणराव पासलकर, राजिप अध्यक्षा अदिती तटकरे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक , कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.दिल्लीच्या जोखडातून रायगड किल्ला मुक्त करून राज्य शासनाच्या ताब्यात आणण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याने या गडाच्या विकासाचे व सुशोभीकरणाचे दार आता खुले झाल्याचे कदम यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना यंदाचा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. (वार्ताहर)- कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान व स्फूर्तिस्थान असलेल्या या रायगड किल्ल्याच्या विकासासाठी ५६५ कोटींचा विकास आराखडा केंद्र व राज्य शासनाने मंजूर केला असून, या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले. जगदीश कदम यांनी स्मारक मंडळातर्फे गेली १२२ वर्षे रायगडावर शिवपुण्यतिथी सोहळा साजरा केला जात असल्याचे सांगितले.