शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
2
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
3
उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपायला आली, पण मविआ, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटेना, अजून एवढ्या जागांवर वाद कायम
4
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
5
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
6
Rule Change: एलपीजी ते क्रेडिट कार्डापर्यंत; १ नोव्हेंबरपासून होणार 'हे' ६ बदल, खिशावर होणार परिणाम
7
सोफिया सीव्हिंगने 'इंडिया मास्टर्स पिकलबॉल' स्पर्धेत मारली बाजी! मिळवलं पहिल्या हंगामाचं जेतेपद
8
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
9
नागा चैतन्यने पुसून टाकली समांथाची शेवटची आठवण! शोभिताशी लग्न करण्यापूर्वी Ex पत्नीसोबतचा फोटो केला डिलीट
10
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
11
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
12
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
13
Stock Market Opening: दिवाळीच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २४,२५० वर; सेन्सेक्सही वधारला
14
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
15
याेगी यांच्या भक्तीमागे संघाचीही शक्ती; ‘संघ-भाजप’मध्ये सारे आलबेल : सहकार्यवाह होसबळे
16
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
17
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
18
मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली; मराठा-ओबीसी लढत रंगणार
19
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
20
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा

वाढत्या तापमानाचा निसर्गावर परिणाम

By admin | Published: April 19, 2017 12:45 AM

गेल्या सुमारे वीस वर्षांत प्रथमच विक्रमी तापमानाची अनुभूती सध्या रायगडवासीयांना येत असून वाढत्या तापमानाचे विपरीत परिणाम आता निसर्ग आणि सजीवांवर होताना दिसून येत आहेत

अलिबाग : गेल्या सुमारे वीस वर्षांत प्रथमच विक्रमी तापमानाची अनुभूती सध्या रायगडवासीयांना येत असून वाढत्या तापमानाचे विपरीत परिणाम आता निसर्ग आणि सजीवांवर होताना दिसून येत आहेत, असा निष्कर्ष भूगोल अभ्यासक तथा पोलादपूर येथील एस.एम.कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.समीर बुटाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे. डॉ.बुटाला सातत्याने महाड पोलादपूर परिसरातील वाढत्या तपामानाची नोंद घेवून त्या अनुषंगाने वातावरणातील बदलाचा सातत्यपूर्ण अभ्यास करीत आहेत. मंगळवारी पोलादपूर-महाडमधील दुपारी बारा वाजताचे तापमान ३८ ते ४२ अंश सेल्सिअस इतके आढळले असून, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण २२ टक्के निष्पन्न झाले आहे.वाढत्या तापमानाचे भौगोलिक परिणाम विषद करताना डॉ.बुटाला म्हणाले, अपेक्षित तापमानापेक्षा अधिक तापमान वाढल्याने पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या ‘वातावरण’ नामक आवरणातील अनेक वायू अधिक प्रमाणात प्रसरित होऊन, त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम प्राणिमात्रांसह भूभागावर देखील होतो. तो परिणाम आता हळूहळू दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे विशेष: सह्याद्री रांगातील खडकातील मूलद्रव्ये प्रसरण पावतात, परिणामी खडक फुटतात. याची प्रचिती महाड तालुक्यातील माझेरी घाटातील भूस्खलनानंतर आली आहे. खडकांप्रमाणेच माती, तिच्या उष्णता ग्रहण करण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक तापत असल्याने तिच्यातील नैसर्गिक मूलद्रवे ऱ्हास पावतात. मातीमध्ये अनेक सूक्ष्म जीवांचा अधिवास असतो. हे जीव अतिउष्णतेमुळे नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. माणसासह निसर्गातील प्रत्येक सजिवाची कार्यक्षमता त्याच्यामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. शरीरातील पाण्याच्या प्रमाणात घट होत असल्याने कार्यक्षमता कमी होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.वाढते तापमान व हवेत सोडला जाणारा कार्बन डायआॅक्साईड वायू याचा विशिष्ट परिणाम होत आहे. मुळात कार्बन डायआॅक्साईड हा वायू वातावरणावरच्या स्तरावर राहतो व एखाद्या भांड्यासारखी उष्णता वातावरणातील खालच्या थरात थोपवून धरतो त्यामुळे तापमान अधिक वाढते. याचीही प्रचिती सध्या येत असल्याचा निष्कर्ष डॉ.बुटाला यांनी व्यक्त केला आहे. (विशेष प्रतिनिधी)