शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

खटुआ समितीचा अहवाल, सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय जैसे थे! संघटनांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 07:04 IST

खटुआ समितीचा अहवाल; राज्यातील कर्मचारी संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया

मुंबई : राज्य सरकारीकर्मचारी व अधिकारी यांच्या सेवानिवृत्तीचे वय जैसे थे म्हणजेच ५८ वर्षेच ठेवावे, अशी शिफारस निवृत्त सनदी अधिकारी बी.सी.खटुआ यांच्या समितीने केल्याचे समोर आल्याने निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याºया कर्मचारी व अधिकारी संघटनांनाजबर धक्का बसला आहे. समितीने दिलेला अहवाल अत्यंत एकांगी असून तो शासनाने स्वीकारू नये, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे.

खटुआ समितीने दोन वर्षांपूर्वीच अहवाल दिला होता; मात्र तो समोर आलाच नाही. हा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी कर्मचारी संघटना सातत्याने करीत होत्या. तरीही आधीचे व आताचे सरकार दाद देत नव्हते. शेवटी एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारात हा अहवाल मिळवला आणि निवृत्तीचे वय ५८ वर्षे ठेवावे अशी शिफारस समितीने केल्याचे उघड झाले. एवढेच नव्हे तर ‘वर्ग ड’ च्या कर्मचाऱ्यांचे सध्याचे निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे, मात्र ते देखील ५८ करावे अशी शिफारस या समितीने केली आहे. मात्र जे गुणवत्ताधारक कर्मचारी आहेत आणि ज्यांना ६० वर्षापर्यंत काम करण्याची इच्छा आहे; त्यांना संधी द्यावी अशी विरोधाभासी शिफारसदेखील समितीने केली. निवृत्तीचे वय सरसकट ६० वर्षे करण्याची समितीने शिफारस केलेली नाही.

समितीसमोर कर्मचारी-अधिकारी संघटनांनी मांडलेली भूमिका, २३ राज्यांमध्ये निवृत्तीचे वय ६० वर्षे असणे, निवृत्तीचे वय वाढविल्याने अनुभवी कर्मचाऱ्यांचा शासनास होणारा फायदा या बाबींची दखल समितीने अहवालात घेतल्याचे दिसत नाही. मात्र त्याच वेळी सोलापूर जिल्ह्यात कार्यरत जलसंपदा विभागाच्या एका उत्साही उपअभियंत्याने ४९६८ कर्मचारी व नागरिकांची मते जाणून घेतली. त्यात बहुतांश लोकांचा निवृत्तीचे वय ६० करण्यास विरोध होता असा अजब निष्कर्ष समितीने अहवालात मांडला आहे. हा निष्कर्ष अत्यंत हास्यास्पद व निराधार असल्याची टीका कर्मचारी संघटनांनी केली आहे.खटुआ समितीचा अहवाल अत्यंत अनाकलनीय आहे. भाडोत्री माणसांकडून तो तयार करून घेतलेला दिसतो. यापुढे असा कुचकामी आणि बेजबाबदार अहवाल कोणी देऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी. - ग. दि.कुलथे, नेते, राजपत्रित अधिकारी महासंघ.ड वर्ग कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वरून ५८ करण्याची खटुआ समितीची शिफारस अत्यंत अन्यायकारक आहे. - भाऊसाहेब पठाण, अध्यक्ष, चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनाएक अत्यंत टुकार, मनमानी अहवाल देऊन खटुआ समितीने कर्मचाऱ्यांच्या तोंडाला अक्षरश: पाने पुसली आहेत. - विश्वास काटकर, सरचिटणीस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना

 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारी