शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

२६ जानेवारीपासून माहिती अधिकार आॅनलाइन सुरु होणार

By admin | Published: January 10, 2017 6:28 PM

राज्यातील माहिती अधिकारांतर्गत अर्ज करणा-यांना २६ जानेवारीपासुन व्यक्तीगत अर्ज करण्यासह माहिती मिळविण्यासाठी थेट आॅनलाइन कार्यप्रणालीचा वापर करावा लागणार आहे.

- राजू काळे

भार्इंदर, दि. 10  - राज्यातील माहिती अधिकारांतर्गत अर्ज करणा-यांना २६ जानेवारीपासुन व्यक्तीगत अर्ज करण्यासह माहिती मिळविण्यासाठी थेट आॅनलाइन कार्यप्रणालीचा वापर करावा लागणार आहे. राज्य सरकारने तसे निर्देश सर्व स्थानिक प्रशासन, जिल्हापरिषदा व पोलिस यंत्रणांना दिले असुन त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्थादेखील केली आहे. यामुळे अर्जदारांना घरबसल्या माहिती अर्ज करुन माहिती मिळविता येणार आहे. तसेच संबंधित कार्यालयांना देखील निश्चित मुदतीतच अर्जदारांना माहिती द्यावी लागणार आहे. देशात डिजिटल युगाची सुरुवात झाल्याने राज्य सरकारने नागरीसेवा आॅनलाइन कार्यप्रणालीद्वारे देण्याला सुरुवात केली आहे. त्यातील काही सुरु झाल्या असुन काही सुरु केल्या जात आहेत. यातील महत्वाच्या आरटीआयला (माहिती अधिकार) आॅनलाइनच्या कक्षेत आणले जात आहे. त्याची सुरुवात २६ जानेवारीपासुन राज्यभर केली जाणार आहे. तत्पुर्वी माहिती अधिकारांतर्गत अर्ज करताना अर्जदाराला थेट संबंधित कार्यालयात जावे लागत होते. त्यानंतर निश्चित मुदतीत माहिती घेण्यासाठी त्या कार्यालयाकडुन अर्जदाराला पाचारण केले जात होते. यात पोस्टाद्वारे अर्ज व माहिती देण्याची सुविधा देण्यात आली असली तरी त्याचा वापर कमी प्रमाणात होतो. पुरविण्यात येणा-या माहितीपोटी आवश्यक कागदपत्रांचे शुल्क आकारुन अर्जदाराला माहिती दिली जाते. हिच पद्धत आॅनलाइन पद्धतीवर अवलंबविण्यात येणार आहे. परंतु, वेळेत माहिती न मिळाल्याने अनेकदा अर्जदारांना अपिलात जावे लागते. त्यावरही अर्जदाराचे समाधान न झाल्यास तो माहिती आयोगाच्या राज्य व विभागीय आयुक्तांकडे दाद मागतो. त्यावेळी घेण्यात येणा-या सुनावण्यांसाठी तसेच माहिती वेळेत मिळविण्यासाठी अर्जदाराचा संबंधित कार्यालयात अनेकदा हेलपटा मारावा लागतो. त्यात त्याचा वेळ व पैसा वाया जातो. सध्या माहिती अधिकारांतर्गत अर्जांची संख्याही सतत वाढत आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांचा व्याप वाढत असुन त्याचा दैनंदिन कामात मोठा तांत्रिक अडथळा निर्माण होत आहे. माहिती वेळेत मिळावी तसेच ती मिळविण्यासाठी अर्जदार थेट संबंधित कार्यालयात धाव घेत असल्याने कर्मचा-यांच्या कामात व्यत्यय येत असल्याचा दावा कर्मचारी व अधिका-यांकडुन केला जातो. यात प्रामुख्याने स्थानिक प्रशासन, जिल्हापरिषदा व पोलिस (गृह विभाग) यांच्याकडे माहिती अधिकारांतर्गत अर्जाचे प्रमाण अधिक आहे. यामुळे दैनंदिन कामाचा निपटारा तसेच माहिती देताना त्यात येणारे अडथळे दुर करण्यासह अर्जदारांना माहिती घेण्यासाठी थेट संबंधित कार्यालयात न जाता अर्जदाराला अर्ज करण्यासह माहिती मिळावी, यासाठी यासाठी राज्य सरकारने २६ जानेवारीपासुन आॅनलाइन कार्यप्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १० जानेवारीला जिल्हास्तरावर व्हिडीयो कॉन्फरन्सीद्वारे आॅनलाइन कार्यप्रणालीचे सादरीकरण करण्यात आल. १२ जानेवारीलाही त्याचे पुर्नसादरीकरण करण्यात येणार आहे.