शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

राजकारणापायी दंगली घडवल्या जातात - शिवसेना

By admin | Published: October 11, 2015 11:52 AM

निवडणूक जिंकायची असेल हिंदू - मुस्लिम दंगली घडवायच्या आणि त्या आगीवर राजकीय भाकरी भाजायची हे गणितच बनले आहे असे परखड मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडले आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ -  देशात राजकीय कारणासाठी धार्मिक तेढ निर्माण केली जात असून निवडणूक जिंकायची असेल हिंदू - मुस्लिम दंगली घडवायच्या आणि त्या आगीवर राजकीय भाकरी भाजायची हे गणितच बनले आहे असे परखड मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडले आहे. दादरीसारख्या घटनांमध्ये कठोर कारवाई करण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिली असली तरी मुळात धार्मिक तेढ कोण वाढवतंय असा सवालही त्यांनी भाजपाला उद्देशून विचारला आहे. 

रविवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये संजय राऊत यांनी गोमांस वादावर 'रोखठोक' मतं मांडली आहे. १९९१ मध्ये भाजपाच्या अयोध्या आंदोलनानंतर देश मनाने दुभंगला आणि अजूनही ही दरी रुंदावतच आहे. नोएडीतील दादरी येथे गोमांसच्या वादावरुन एका मुस्लिम तरुणाची झालेली हत्या हे त्याचे उदाहरण आहे. गोमांसाच्या तुकड्यावर देशातील धार्मिक तेढ शिगेला पोहोचली आहे असे राऊत यांनी म्हटले आहे. देशाला नव्या आगीत ढकलणारे हे चित्र असून दादरीतील गोमांस हत्येचा वापर बिहारच्या  निवडणुकीत कसा करता येईल यासाठी सेक्यूलरवाद्यांकडून राजकीय डावपेच आखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मुंबईत जैन धर्मीयांच्या पर्युषणादरम्यान मांसविक्रीवर बंदी टाकण्याची मागणी करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही मागणी केली गेली असे सांगत राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर आझम खान यांनी दादरीप्रकरणानंतर संयुक्त राष्ट्राला केलेली तक्रार हादेखील धार्मिक तेढ वाढवण्याचा भाग आहे अशी टीकाही त्यांनी केली. शेतकरी आत्महत्या करतोय, भ्रष्टाचार, महागाईमुळे माणूसच माणसाला खातोय. यावरुन कोणाचे धर्म खवळत नाही पण गोमांसच्या अफवेवरुन देश दुभंगतो अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.