शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

मुंबईला जलप्रलयाचा धोका - संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

By admin | Published: May 20, 2016 4:10 PM

जवळपास चार कोटी भारतीयांना समुद्राच्या वाढत्या पातळीचा धोका असून विशेषत: मुंबई व कोलकात्यावर सगळ्यात जास्त भीतीचे सावट असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक अहवालात नमूद करण्यात आले

ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्रे, दि. 20 - जवळपास चार कोटी भारतीयांना समुद्राच्या वाढत्या पातळीचा धोका असून विशेषत: मुंबई व कोलकात्यावर सगळ्यात जास्त भीतीचे सावट असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2050 पर्यंत भारतातील समुद्रकिनाऱ्यानजीक राहणाऱ्या सुमारे 4 कोटी लोकांना पूराचा फटका बसू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्या शहरांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे, त्यांना जास्त धोका आहे.
ग्लोबल एन्व्हायर्नमेंट आउटलुकच्या अंदाजानुसार पॅसिफिक आणि आशियामधील देशांना वातावरणातील बदलांमुळे सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे. 2050 पर्यंत समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे सगळ्यात जास्त 10 शहरांचे नुकसान होणार असून त्यातली 6 शहरे आशिया पॅसिफिकमध्ये येतात.
 
सगळ्यात जास्त धोका भारताला
 
ज्या देशांना सर्वादिक फटका बसणार आहे, त्यामध्ये भारत अग्रस्थानी आहे. भारतामध्ये 4 कोटी लोकांना पुरांचा व अन्य जलप्रलयाचा फटका बसेल तर त्याखालोखाल बांग्लादेशमधल्या 2.5 कोटी लोकांना सागरी कोपाच्या झळा बसणार आहेत. चीनमधल्या सागरी किनाऱ्यानजीक राहणाऱ्या 2 कोटी लोकांना फटका बसणार असून फिलिपाइन्समध्ये 1.5 कोटी लोकांना जलप्रलयाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
 
वाढत्या वसाहतींचा ताण
 
सागरी किनाऱ्यानजीक शहरीकरण वेगाने वाढत असून त्यामुळे व आर्थिक विकासामुळे वसाहतींची संख्या वाढत आहे. यामुळे सागरी किनाऱ्यांची जलप्रलयाचा सामना करण्याची नैसर्गिक क्षमता कोलमडत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. विशेषत: भारत, चीन व थायलंडमध्ये आर्थिक प्रगतीमुळे नागरीकरण वाढत आहे, आणि लोकसंख्येचे केंद्रीकरण होत आहे. 
 
 
पूर व जलप्रलयाचा धोका असलेली शहरे
 
भारत - मुंबई, कोलकाता. थायलंड - बँकॉक, म्यानमार - याँगोन, व्हिएतनाम - हो ची मिन्ह व हाय फोंग
यापैकी अनेक शहरे आत्ताही पुरांचा सामना करत आहेत. परंतु विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे पूरनियंत्रणाची क्षमता मर्यादीत आहे. जलप्रलयाखेरीज यापैकी अनेक शहरांना वादळांचा सामना करायला लागू शकतो अशी भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.