शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
4
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
5
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
6
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
7
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
8
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
9
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
10
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
11
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
12
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
13
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
14
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
15
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
16
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
17
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
18
कोकण हार्टेड गर्ल घराबाहेर! अंकिताच्या चाहत्यांना मोठा धक्का, म्हणाली- "मी १०० टक्के दिले, पण..."
19
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
20
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार

मानसिक आरोग्याला ‘गॅजेट’चा धोका

By admin | Published: October 10, 2015 4:31 AM

घरातील चार जण चार कोपऱ्यात हातात मोबाइल किंवा लॅपटॉपसमोर बसलेले दिसतात. शहरांमधील हे चित्र म्हणजे तंत्रज्ञानाच्या प्रसाराचा वाईट परिणाम आहे.

- पूजा दामले,  मुंबईघरातील चार जण चार कोपऱ्यात हातात मोबाइल किंवा लॅपटॉपसमोर बसलेले दिसतात. शहरांमधील हे चित्र म्हणजे तंत्रज्ञानाच्या प्रसाराचा वाईट परिणाम आहे. तथापि, हा परिणाम दिसतो तितका सरळ, साधा अजिबात नाही. या गॅजेट्सच्या वेडामुळे माणसे एकाकी होत असून त्यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येत असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. १० आॅक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा होतो. देशात अजूनही मानसिक आरोग्याविषयी म्हणावी तशी जनजागृती नाही. मानसिक आजार आणि उपचारांसंदर्भात अजूनही दुर्लक्ष केले जाते. गेल्या काही वर्षांत डिप्रेशन ही मानसिक आजारांमधील सर्वांत मोठी समस्या समजली जात होती. मात्र, सध्या ‘एकटेपणा’ ही मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सर्वांत भयंकर समस्या बनत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ हरीश शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना नमूद केले. गॅजेटचे व्यसन जडणे, हे एकच व्यसन मानले जात नाही. तर गॅजेटच्या अनुषंगाने अनेक व्यसने जडतात. कारण, मोबाइलच्या व्यसनांमध्ये गेम, चॅटिंग, ई-मेल्स, फोन कॉल्स, मेसेजेस अशा अनेक अ‍ॅप्लिकेशन्समुळे लोक त्यांच्याही आहारी जात आहेत. या सर्वांमध्ये व्यक्ती इतकी गुंतत जाते की, त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्तींचाही विसर पडतो. नवरा-बायकोच्या नात्यांमधील दुराव्यासाठी हे प्रमुख कारण बनले आहे. गॅजेट्सच्या व्यसनामुळे बोट, डोळे आणि मेंदू सारखेच अ‍ॅक्टिव्ह राहतात. त्यामुळे माणसे इतकी थकून जातात की, त्यानंतर कोणत्याही अन्य शारीरिक क्रिया ते करु शकत नाहीत, असे डॉ. शेट्टी यांनी सांगितले.आता हवे ‘गॅजेट’ हायजिन...सध्या अनेक वस्तूंसह शरीराच्या स्वच्छतेविषयी जनजागृती होताना दिसते. प्रत्यक्षात गॅझेट्स हायजिनची आवश्यकता निर्माण झाली आहे. असा हायजिन आणण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही गॅझेट्स घरात कुठपर्यंत आणायचे, कुठे ठेवायचे हे निश्चित केले पाहिजे. घरातील सर्व मंडळींनी रात्री १०.३० नंतर गॅजेट्स वापरू नयेत. घराच्या हॉलमध्ये सगळी गॅझेट्स एकाच ठिकाणी ठेवावीत. लॅपटॉपचा वापर बेडरूममध्ये न करता हॉलमध्येच करावा. एका दाम्पत्याची अशीही कहाणी...मुंबईतील एक दाम्पत्य उपचारासाठी आले होते. नवरा टूरवर असताना, पत्नीला एकाकी वाटत होते. काम असल्यामुळे पतीला तिच्याशी सतत बोलणे शक्य नव्हते. या काळात व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पत्नी तिच्या शाळकरी मित्राच्या संपर्कात आली. हळूहळू दोघांमधील संबंध दृढ होत गेले. टूरवरून आल्यावर हा प्रकार पतीच्या लक्षात आला. पहिल्यांदा पत्नीने यासंदर्भात आपले काही चुकले हे मान्य केले नाही. नंतर सगळा घटनाक्रम हळूहळू उलगडत गेला. त्यानंतर नक्की काय घडले, याचा उलगडा पत्नीला झाल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी सांगितले. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून गोष्टी इतक्या वेगाने घडत जातात. अनेक नात्यांमध्ये दुराव्याची शक्यता निर्माण होते. समुपदेशनामुळे यातून मार्ग निघतो, असे डॉ. शेट्टी यांनी सांगितले. तरुणांमध्येही वाढतोय मानसिक ताण!गेल्या १० वर्षांमध्ये मोबाइल आणि इंटरनेटच्या क्रांतीमुळे तरुण पिढीला ‘व्हॉट नेक्स्ट’ हा प्रश्न सतावू लागला आहे. अजून महागडा, अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मोबाइल, गॅजेट्सकडे यांचे लक्ष असते. सोशल नेटवर्किंग साइट्सच्या आभासी जगात ही तरुणाई जगते. कुटुंबापासून डिसकनेक्ट होत जातात. आभासी जगात अधिकाधिक वेळ गेल्याने कालांतराने मानसिक ताण उसळतो. एका क्लिकवर जग उपलब्ध झाल्याने मानसिक समस्या वाढत आहेत. नातेसंबंध दुरावून एकटेपणा येतो. त्यातूनच आत्महत्यांचे विचार मनात डोकावू लागत असल्याचे वोक्हार्ट रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सोनल आनंद यांनी सांगितले.