शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

रस्त्यावर उतरुन भाजप आणि संघाविरोधात आंदोलनाचा इशारा - राधाकृष्ण विखे पाटील

By admin | Published: February 20, 2016 10:05 PM

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हेतुपुरस्सर लक्ष्य केले जात आहे असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे

ऑनलाइन लोकमत - 

मुंबई, दि. 20 - देशभक्त विरूद्ध देशद्रोही असा वाद उभा करुन केंद्र सरकार आपले आजवरचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्वलंत प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हेतुपुरस्सर लक्ष्य केले जात आहे असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. भाजप व संघाचे हे षडयंत्र आम्ही कदापीही यशस्वी होऊ देणार नाही. हे उपद्व्याप थांबले नाही तर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून चोख प्रत्युत्तर देतील, असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला आहे. शिर्डीमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. 
राहुल गांधी यांनी रोहित वेमुलाची आत्महत्या आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील घटनेसंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण भाजप आणि संघ परिवाराने षडयंत्र रचून त्यांच्याविरोधात अपप्रचार सुरु केला. गांधी कुटुंबाची बलिदानाची, त्यागाची परंपरा राहिली आहे. या कुटुंबाला भाजप आणि संघाकडून देशभक्तीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. भाजप व संघाला देशभक्तीवर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आज तिरंगा हातात घेवून मोर्चे काढत आहे. परंतू नागपुरातील संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्यानंतर किती वर्षे तिरंगा फडकविला नाही, याची माहिती अभाविपने जाणून घ्यावी, असंही ते यावेळी बोलले आहेत. 
 देशभक्तीच्या घोषणा देणारे भाजपवाले अफजल गुरुवरुन राजकारण करु पाहत आहेत. या अतिरेक्याला कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळातच फासावर चढविण्यात आले. पण आता त्याच अफजल गुरुला हुतात्मा संबोधणा-या पीडीपीसोबत भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये युती सरकार स्थापन केले, याचे भान भाजप कार्यकर्त्यांना कसे राहिले नाही, अशीही विचारणा विखे पाटील यांनी केली आहे.