शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

मुंबईत समन्यायी पाणीवाटपासाठी २ महिन्यांत रोडमॅप - मुख्यमंत्री

By admin | Published: April 13, 2016 1:56 AM

मुंबईमध्ये पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी येत्या दोन महिन्यांत एक रोडमॅप तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महापालिकेला दिले. या समन्यायी

मुंबई : मुंबईमध्ये पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी येत्या दोन महिन्यांत एक रोडमॅप तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महापालिकेला दिले. या समन्यायी वाटपासाठी मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि जलतज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे त्यांनी विधानसभेत जाहीर केले. मुंबईत दररोज प्रतिदिन ९०० एमएलडी पाण्याची गळती होत असल्याची कबुलीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. मुंबईत पाणी मुबलक आहे, पण वितरण व्यवस्था सक्षम नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली. मुंबईतील विशेषत: पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पाणीटंचाईबाबत भाजपाचे सदस्य योगेश सागर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. शहरांतील विविध भागांना असमान पाणीवाटप अन्यायकारक असल्याचे सांगून, त्यांनी जुन्या जलवाहिन्यांमुळे किती प्रचंड पाणी वाया जाते, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर दररोज ९०० एमएलडी पाण्याची गळती होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. मुंबईत ८० ते १०० वर्षे जुन्या जलवाहिन्या आहेत. त्या गंजलेल्या आणि गळक्याही आहेत. त्यामुळे मुंबईत जो पाणीप्रश्न भेडसावत आहे, तो प्रामुख्याने पाणीवितरणातील उणिवांमुळे आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने जुन्या जलवाहिन्या बदलण्याचा एक प्रकल्प तयार केला असून, त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आशिष शेलार, मनिषा चौधरी, राम कदम, अतुल भातखळकर, सुनील प्रभू आदी सदस्यांनी या लक्षवेधीवर बोलताना, मुंबई उपनगरातील पाणीटंचाईच्या समस्या लक्षात आणून दिली. राम कदम यांनी घाटकोपर परिसरात रहिवाशांना दोन-दोन फूट खड्डा खणून त्यातून पाणी भरावे लागत असल्याचे सांगितले, तर मनिषा चौधरी यांनी गोरेगाव ते दहीसरमधील झोपडपट्टीवासियांना अत्यंत कमी पाणीपुरवठा होत असल्याचे सांगत, बऱ्याच भागांत पाणी गायब असल्याचे सांगितले. तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचना महापालिकेने त्या रोडमॅपमध्ये लक्षात घेऊन उपाययोजना करावी, असे निर्देशही देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)