शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 14:45 IST

corona: भाजप नेते राजकारण थांबवत नाहीत, अशी टीका पवारांनी केलीय.

ठळक मुद्देभाजप नेते राजकारण थांबवत नाहीत, हे दुर्दैवी वाटतंगुजरातमधील परिस्थिती विदारक, उत्तर प्रदेशची अवस्था चांगली नाहीही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची

मुंबई: महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची स्थिती भयंकर होताना दिसत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला लॉकडाऊन म्हणणार नाही, असे सांगत कठोर निर्बंध लागू केले. १४ एप्रिल ते १ मे या पंधरा दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आले असून, यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मात्र, भाजपशासित राज्यांमध्येही कोरोना संकट भीषण असून, तेथे कोरोनाचे व्यवस्थापक चांगले असल्याचा विरोधकांचा दावा फोल ठरतो, असे सांगत पवार यांनी महाविकास आघाडी सरकारची बाजू उचलून धरली आहे. (rohit pawar criticises bjp over corona and other various issues)

केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रा व्यतिरिक्त छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब, बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरयाणा, बिहार आदी राज्यांमध्येही करोनाचं संकट भीषण असल्याचं दिसून येतं. या राज्यांपैकी सहा राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपशासित राज्यांमधील करोना व्यवस्थापन खूपच चांगलं असल्याने तिथं करोना येत नाही हा विरोधकांचा दावा फोल ठरतो. यावरून राजकारण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावं, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विरोधकांवर रोहित पवार यांनी निशाणा साधला.

राज्यात काय सुरू आणि काय बंद? पाहा, एका क्लिकवर

भाजप नेते राजकारण थांबवत नाहीत

भाजपचे नेते महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीवरुन राजकारण करणं थांबवत नाहीत, हे दुर्दैवी वाटतं. आज राजकारणाची वेळ नसतानाही महाराष्ट्रातील सरकार असमर्थ आहे, इथली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली अशाप्रकारची विधानं विरोधकांकडून केली जात आहेत. ही गोष्ट मात्र निश्चितच खरीय की महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त आहे आणि रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होतेय. मात्र हे संकट रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सर्व राज्यसरकार करतंय हेही तेवढंच खरंय. राज्यात परत एकदा नाईलाजास्तव कठोर निर्बंध घालण्याची वेळ सरकारवर आली, असे रोहित पवार म्हणाले. 

लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर

कोरोना लसीकरणात आज महाराष्ट्र संपूर्ण देशात आघाडीवर आहे. आतापर्यंत राज्याने १ कोटी ५ लाख २९ हजार लसी दिल्या. यामध्ये पहिला डोस ९५ लाख २० हजार ७२५ लोकांना तर दुसरा डोस १० लाख ८ हजार लोकांना देण्यात आला. आज आपण दररोज साडेतीन ते चार लाख नागरिकांना लस देत असून आपली लसीकरणाची क्षमता ६ लाख प्रतिदिवसापर्यंत वाढवलीय. लस वाया जाण्याचे प्रमाणही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अत्यंत कमी आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.

मोफत अन्नधान्य, अर्थसहाय्य, अनुदान... निर्बंध कडक करताना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 'पॅकेज'

गुजरातमधील परिस्थिती विदारक

गुजरातचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तिथंही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सुरत, अहमदाबाद, जामनगरमध्ये बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रुग्णांवर हॉस्पिटलच्या आवारात, फरशीवर, खुर्चीवर बसून उपचार चालू असल्याचं चित्र पहायला मिळतं. दुसरीकडं मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी आठ-आठ तास थांबावं लागत असल्याचं विदारक चित्र पाहताना मन हेलावून जातं. रुग्णवाहिका नसल्याने कोणी चार चाकीतून मृतदेह नेतंय तर कोणी हात गाड्यावरून आहे. हे आज गुजरातचं भीषण वास्तव आहे, अशा शब्दांत पवार यांनी विरोधकांना आरसा दाखवला. 

उत्तर प्रदेशची अवस्था चांगली नाही

उत्तर प्रदेशमध्येही रुग्णांची अवस्था काही चांगली नाही. तिथं तर तीन रुग्णांना लस म्हणून रेबीजचं इंजेक्शन दिल्याची अत्यंत धक्कादायक बाब पुढं आली. बिहारमध्येही कोरोनाचे व्यवस्थापन नीट होत नसल्याचे निदर्शनास येतंय. तसंच मृतांची संख्याही सरकार लपवत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या, अशी टीका करत ही गोष्ट मात्र निश्चितच खरीय की महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त आहे आणि काही रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होतेय, मात्र हे संकट रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सर्व राज्यसरकार करतंय हेही तेवढंच खरंय. पहिल्या लाटेपेक्षा ही लाट अत्यंत तीव्र आहे, रुग्णवाढीचा वेगही अधिक आहे, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले. 

महिन्याला १० हजार कमावणाऱ्या रिक्षाचालकांना केवळ दीड हजार; भाजपचे टीकास्त्र

ही मानवतेची लढाई

मला आजच्या परिस्थितीबाबत कोणाला दोष द्यायचा नाही. मला विरोधकांनाही हेच सांगायचंय की ही वेळ एकमेकांची उणी-दुणी काढण्याची नसून एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करण्याची आहे. ही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची आहे. आमच्या विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे करोना हा केवळ एखाद्याच राज्यात वाढत नसून तो सगळीकडेच वाढतोय. या कठीण काळात सगळ्या यंत्रणेचा कस लागतोय. अशा परिस्थितीत आपण भांडत बसलो तर त्यात नुकसानच अधिक होणार आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस