शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

रोहयोला नव्या तरतुदींचा फायदा

By admin | Published: March 01, 2016 1:11 AM

केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगार हमी योजनेसाठी शासनाने ३८ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेंतर्गत तालुक्यातील सध्याची स्थिती पाहता शासन सध्या तरतूद करीत

शिरूर : केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगार हमी योजनेसाठी शासनाने ३८ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेंतर्गत तालुक्यातील सध्याची स्थिती पाहता शासन सध्या तरतूद करीत असलेली रक्कमही पूर्णत: खर्ची पडत नसल्याचे वास्तव आहे. अशात या योजनेतील मजुरांचा रोजगार वाढवल्यास या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे होऊ शकतील व नव्या तरतुदींचाही फायदा मिळू शकेल.मनरेगासाठी आतापर्यंत प्रत्येक शासनाने प्राधान्याने लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मनरेगांतर्गत सर्वांत मोठी समस्या आहे ती, मजुरांच्या रोजगाराची. आजच्या स्पर्धेच्या युगात खासगी स्तरावर चांगला रोजगार उपलब्ध होत आहे. अगदी कृषी विभागातही शेतीची कामे करणाऱ्या मजुरांना प्रतिदिन ३०० ते ४०० रुपये मिळत आहेत. औद्योगिक वसाहतींमध्ये अकुशल कामगारांनाही प्रतिदिन ३०० ते ४०० रुपये (ओव्हरटाईमचे पैसे वेगळे) मिळत आहेत. बांधकाम क्षेत्रात गवंड्याच्या हाताखाली काम करणाऱ्या मजुरांनाही ३०० ते ३५० रुपये प्रतिदिन मजुरी मिळते. अशा परिस्थितीत मनरेगांतर्गत १८१ रुपये प्रतिदिन मजुरीकडे मजूर पाठ फिरवताना दिसतात. तालुक्यात मनरेगा विभागाकडे आजमितीला २० हजार ३०० मजुरांची नोंदणी आहे. मात्र, तालुक्यात आज फक्त ३४ वैयक्तिक विहिरींची कामे सुरू असून, केवळ ४३५ मजूर कामावर आहेत. २०१६ वर्षासाठी शासनाने मनरेगाच्या कामासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मनरेगांतर्गत पानमंद रस्ते, शेतरस्ते, वैयक्तिक सिंचन विहीर, फळबाग लागवड, कंपोस्ट खत, शोष खड्डे, वैयक्तिक शौचालय उभारणी, गाईगोठा, शेड बांधणे, शेळी निवारा शेड बांधणे, तलावातील गाळ काढणे, माती बंधारे, सिमेंट बंधारे बांधणे आदी स्वरूपाची कामे केली जातात. तालुक्यातील ग्रामपंचायतींमधून या संदर्भातल्या कामांची मागणी मनरेगा विभागाकडे केल्यानंतर हा विभाग ती कामे मंजूर करतो. अशा कामांसाठी यंदाच्या वर्षाचा ६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मागील (२०१५)वर्षी तीन कोटी रुपयांचा आराखडा होता. पैकी केवळ १ कोटी ३ लाख रुपयांचीच कामे होऊ शकली. यंदाच्या वर्षी आराखडा दुप्पट रकमेचा आहे. मात्र, ही रक्कमही पूर्णत: खर्च होणार की नाही, याबाबत शंका आहे.