शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून १,६४२ कोटी रु पयांची भरपाई

By admin | Published: March 08, 2017 12:25 AM

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून खरीप हंगाम २०१६च्या सहभागी शेतकऱ्यांना १६४२ कोटी रु पयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. राज्यातील २४ लाख शेतकरी

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून खरीप हंगाम २०१६च्या सहभागी शेतकऱ्यांना १६४२ कोटी रु पयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. राज्यातील २४ लाख शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर समृद्ध शेतकरी उन्नत शेती अभियान गुढीपाडव्यापासून सुरु होणार आहे, असे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी उपस्थितीत केलेल्या चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले की, मागील वर्षी सप्टेंबर - आॅक्टोबरमध्ये मराठवाड्यातील काही भागात अतिवृष्टी झाली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून लातूर विभागाला सर्वाधिक १३२८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. खरीप हंगाम २०१६मध्ये राज्यातील १,०९ कोटी शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला. त्यात ३७ लाख शेतकरी कर्जदार व ७२ लाख शेतकरी बिगर कर्जदार आहेत. नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या २४.०३ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित झाली आहे. तुर व कापूस पिकाची नुकसान भरपाई निश्चित होत आहे. विभागनिहाय मदत अशी : कोकण-६ लाख, नाशिक - ७ कोटी, पुणे - ९९ कोटी ३८ लाख, कोल्हापूर - ७३ लाख ८६ हजार, औरंगाबाद - १९१ कोटी ९२ लाख, लातूर-१३२८ कोटी, अमरावती - ४३ कोटी ३४ लाख, नागपूर - १ कोटी ६७ लाख. (विशेष प्रतिनिधी)जलसंधारण मंत्री राम शिंदे म्हणाले की, दुष्काळ आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचे विकेंद्रीत साठे तयार करण्यासाठी जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. योजनेच्या माध्यमातून ११ हजार ४९४ गावांत काम सुरु असून काही ठिकाणी १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून ५०० कोटी रु पये निधी जमविण्याचा विक्र म झाला आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच गावांची निवड करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.सुक्ष्म सिंचनाला प्राधान्य- सुक्ष्म सिंचनाचे १५ एपिलपर्यंत थकबाकीदारांना अनुदान देण्यात येईल. - २०६५ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचे कार्यारंभ आदेश - ९० लाख शेतकऱ्यांना माती परीक्षण कार्ड वाटपवर्षभरात ४०० प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यतावर्षानुवर्षे रखडलेले जलसिंचन प्रकल्प पूर्ण व्हावेत, यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांत १४१ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. वर्षभरात ४०० प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. जलसिंचन प्रकल्पांसाठी भूसंपादनाच्या अडचणी येत असून सुमारे साडे आठ लाख हजार हेक्टर जमीन संपादनापोटी २ हजार आठशे कोटी रुपये देण्यात आले आहे. त्याचबरोबर दोन महिन्यांत भूसंपादनासाठीची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना अदा करु न भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे.