शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

एफआरपीचे ३,६०७ कोटी रुपये थकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 5:09 AM

राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात उसाची एफआरपीची (रास्त व किफायतशीर दर) एकूण २२ हजार ४२ कोटी रुपये जमा करणे अपेक्षित होते.

पुणे  -  राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात उसाची एफआरपीची (रास्त व किफायतशीर दर) एकूण २२ हजार ४२ कोटी रुपये जमा करणे अपेक्षित होते. मात्र, त्यातील १८ हजार ८२१ कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. राज्यातील शेतकºयांची एफआरपी ३ हजार ६०७ कोटी रुपये रक्कम अजूनही थकीत आहे, असे साखर आयुक्तालयाने म्हटले आहे.साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, एप्रिलअखेरीस राज्यातील साखर कारखान्यांनी ९४९ लाख टन एवढ्या उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यावर देय असलेल्या एफआरपीच्या रक्कमेपैकी ८५ टक्के रक्कम एप्रिल अखेरीस शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. मात्र,अद्यापही राज्यातील शेतकºयांची ३ हजार ६०७ कोटी एफआरपीची रक्कम थकित आहे. शेतकºयांना ही रक्कम तत्काळ मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्र शासनाच्या सॉफ्टलोन योजनेतून राज्यातील कारखान्यांना कर्ज मंजूर झाले आहे. कर्जाची रक्कम मिळताच थकीत एफआरपी आणखी कमी होईल.एप्रिल अखेरपर्यंत उसाच्या एफआरपीची शंभर टक्के रक्कम ४३ साखर कारखान्यांनी शेतकºयांना दिली आहे. तसेच ८० टक्क्यांहून अधिक रक्कम देणाºया कारखान्यांची संख्या ८० असून, ४२ कारखान्यांनी ६० ते ७९ टक्के एवढी रक्कम शेतकºयांना दिली आहे. त्याचप्रमाणे शून्य ते ६० टक्क्यापर्यंत एफआरपी देणाºया कारखान्यांची संख्या ३० एवढी आहे.सुमारे १५ दिवसांपूर्वी शेतकºयांना एफआरपीचे चार हजार ३२४ कोटी रुपये देणे बाकी होते. त्यातील काही कारखान्यांनी शेतकºयांच्या बँक खात्यावर ७१७ कोटी रुपये जमा केले आहेत. २०१८-१९ या उस गाळप हंगाम मध्ये प्रथमच एफआरपीचा देय आकडा चार हजार कोटी रुपयांच्या खाली आला आहे, असेही शेखर गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेbusinessव्यवसाय