शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Maharashtra Politics: “एखादी व्यक्ती नाही, तर भगवा ध्वजच आमच्यासाठी आदर्श”; मोहन भागवत स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 10:08 AM

Maharashtra News: आपल्याला भारत विश्वगुरू बनवायचा आहे. जगाला भारताची गरज आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics:राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणतीही व्यक्ती आपल्यासमोर आदर्श नाही. भगवा ध्वज आपल्यासमोर आदर्श आहे. आपल्या समोर तत्त्व आहेत आणि तत्त्वांमध्ये जर काही चिन्ह असेल तर तो भगवा ध्वज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 

पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, रामभक्त हनुमान हे आमचे आदर्श आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत. आपल्याला भारत विश्वगुरू बनवायचा आहे. संपूर्ण जगाला या देशाची गरज आहे. आपले जीवन देशासाठी आहे. आपण जे काही कमावू, त्याचा देशासाठी त्याग करायला हवा. नव्या पिढीची आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. आपण आपल्या विचारांवर ठाम असले पाहिजे, आपल्या कर्मावर आपण भर दिला पाहिजे, असेही मोहन भागवत म्हणाले. 

धर्माची व्याप्ती खूप मोठी आहे

सनातन धर्म हे एकमेव हिंदू राष्ट्र आहे. जेव्हा जेव्हा हिंदू राष्ट्राची प्रगती होते, तेव्हा ती धर्माच्या प्रगतीसाठी असते. आता सनातन धर्माची उन्नती व्हायला हवी. भारत नेहमीच अमर आणि अपराजित राहिला आहे. धर्म हे या देशाचे सत्व आणि सार आहे. धर्माची व्याप्ती खूप मोठी आहे, त्याशिवाय जीवन चालू शकत नाही, असे मोहन भागवत म्हणाले. 

धर्म म्हणजे केवळ पूजा पद्धती, पंथ, संप्रदाय नाही

धर्म म्हणजे केवळ पूजा पद्धती, पंथ, संप्रदाय नाही. तर धर्म हा मूल्य, सत्य, करुणा, शुद्धता आणि तपस्या यांप्रमाणे अतिशय महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी शेकडो वर्षांपासून अनेक आक्रमणे सोसूनही भारत जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. कारण तेथील लोकांनी धर्म सत्व जपले आहे, असे मोहन भागवत यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत