शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

२६ साखर कारखान्यांना नियमबाह्य कर्जवाटप

By admin | Published: September 21, 2015 1:37 AM

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील १०८६ कोटी रुपयांच्या अनियमितता प्रकरणी ७७ संचालकांवर जबाबदारी निश्चित केली असून, तसे दोषारोपपत्र त्यांना पाठविण्यात आले.

नामदेव मोरे , नवी मुंबईमहाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील १०८६ कोटी रुपयांच्या अनियमितता प्रकरणी ७७ संचालकांवर जबाबदारी निश्चित केली असून, तसे दोषारोपपत्र त्यांना पाठविण्यात आले. प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संचालक मंडळाने २६ कारखान्यांना नियमबाह्य कर्जवाटप केले असून, त्यामुळे बँकेचे ९७५ कोटी २८ लाख ३९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य बँकेमध्ये २००८ ते २०१३ या कालावधीत तत्कालीन संचालक मंडळाने नियम डावलून घेतलेल्या निर्णयामुळे बँकेचे नुकसान झाले. या प्रकरणी शासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजीराव पहिणकर यांची जून २०१४मध्ये चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. १५ महिने चौकशी केल्यानंतर पहिणकर यांनी १० सप्टेंबरला ७७ संचालक मंडळावर दोषारोपपत्र ठेवले. संचालक मंडळाने राज्यातील २६ साखर कारखान्यांना नियमबाह्यपणे ९७५ कोटी २८ लाख ३९ हजार रुपयांचे कर्जवाटप केल्याचे निदर्शनास आले आहे. नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून उणे नक्त मूल्य, संचित तोटा व अपुरा दुरावा असताना हा कर्जपुरवठा केला गेला. कर्ज वसूल न झाल्याने बँकेला २९७ कोटी १४ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान झाले. १४ कारखान्यांना संचालक मंडळाने तारण तथा शासन थकहमी न घेता कर्जवाटप केले, कर्जदार संस्थांकडून ४७४ कोटी ६५ लाख २८ हजार रुपयांची कर्जवसुली झालेली नाही.