शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
3
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
4
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
6
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
7
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
8
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
9
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
10
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
11
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
12
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
13
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
14
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
15
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
16
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
17
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
18
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
19
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
20
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 

'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 5:51 PM

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

S. Jaishankar on Mumbai 26/11 Attack : भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भविष्यात असा हल्ला झाला, तर तो खपवून घेतला जाणार नाही आणि त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल', असे त्यांनी ठणकावून सांगितले. 

मुंबईत रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना जयशंकर म्हणाले की, 'जेव्हा आपण झिरो टॉलरन्सबद्दल बोलतो, तेव्हा चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा अर्थ होतो. मुंबई हे केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी दहशतवादविरोधी प्रतीक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असताना भारताने दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. तसेच, ज्या हॉटेलमध्ये हल्ला झाला होता, तिथेच समितीची बैठक झाली होती.'

परराष्ट्र मंत्री जयशंकर पुढे म्हणाले की, 'भारत जगातील दहशतवादाविरुद्धच्या लढाईत नेतृत्वाची भूमिका बजावत आहे. दिवसा एक काम अन् रात्री दहशतवादी कारवाया, असे आता चालणार नाही. भारत आणि चीन लवकरच लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त सुरू करतील. सीमेवरील परिस्थिती एप्रिल 2020 पूर्वीसारख होईल', अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबई 26/11 हल्ला26 नोव्हेंबर 2008 साली भारताची आर्थित राजधानी मुंबईत आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. लष्कर-ए-तैयबाचे दहा दहशतवादी पाकिस्तानातून सागरी मार्गाने मुंबईत घुसले आणि मुंबईतील ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी अंदाधूंद गोळीबार केला होता. त्या घटनेत 20 जवान आणि 26 परदेशी नागरिकांसह किमान 174 भारतीयांचा मृत्यू झाला होता. तसेच, 300 हून अधिक लोक जखमी झाले होते.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाMumbaiमुंबई