शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

सबनीसांचा दिलगिरीनामा

By admin | Published: January 13, 2016 4:16 AM

पिंपरी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील यांच्या मध्यस्थीनंतर अखेर संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी

- पंतप्रधानांना पाठविले पत्र

पुणे : पिंपरी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील यांच्या मध्यस्थीनंतर अखेर संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने भारतीय जनता पार्टीचे नेते त्यावर आता काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. साहित्य संमेलन ३ दिवसांवर येऊनही वाद शमत नसल्याने पाटील यांनी मंगळवारी दुपारी सबनीस यांची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात सुमारे १२ ते १३ मिनिटांमध्ये सबनीस यांनी त्यांचे निवेदन आणि पंतप्रधानांना पाठविलेले पत्र वाचून दाखविले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि महेश थोरवे-पाटील त्यांच्यासोबत उपस्थित होते.सबनीस म्हणाले, माझ्यामुळे संमेलनाला गालबोट लागू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखाने अनेकांची मने दुखावली. मोदींच्या राष्ट्रभक्तीचा आपण वेळोवेळी गौरवही केला आहे. पण, त्यांचा एकेरी उल्लेख झाल्याने मी त्यांना पत्र पाठवून दिलगिरी व्यक्त केली आहे. झाले गेले गंगेला मिळाले. मराठी भाषा, संस्कृतीवर प्रेम असणाऱ्यांना संमेलनासाठी हार्दिक निमंत्रण देतो. मराठीच्या भवितव्यासाठी संमेलन यशस्वी होणे, त्यासाठी योगदान देणे हे आपले अध्यक्ष म्हणून कर्तव्य आहे. मोदींसंदर्भात आतापर्यंत आपण गौरवपर लिखाण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५ जानेवारीलाच पत्र पाठवून ‘मन की बात’ विषद केली आहे. त्याच्या प्रति महाराष्ट्रातील मंत्र्यांनाही पाठविल्या असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)‘मन की बात’गौतम बुद्ध, महात्मा गांधी यांचे विचार आपण जगाच्या काना-कोपऱ्यांत पोहोचवत आहात. जिवाची पर्वा न करता पाकिस्तानात शरीफ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही गेलात. हे केले ते राष्ट्रहितासाठीच. पुण्यातील एका भाषणात आपला एकेरी उल्लेख झाला. ग्रामीण भागातून आलो असल्याने आपला एकेरी उल्लेख झाला. त्यातून गैरसमज निर्माण झाले. त्यातून मला जिवे मारण्याची धमकी दिली गेली. येथील वातावरण बिघडले आहे. आपला एकेरी उल्लेख होणे ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आप मेरी ‘मन की बात’ समझ पाऐंगे, असे श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.