शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

Sachin Vaze: “तुम्ही IPS अधिकारी, राजकारण्यांचं आयुष्य फक्त ५ वर्ष; बदलीशिवाय काहीच करू शकत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 6:41 PM

Retired IPS Officer Suresh Khopade reaction on Sachin Vaze & Mumbai Police Issue: लोकशाही प्रक्रियेत पोलिसांना काम करताना राज्यकर्त्यांचे ऐकावं लागतं, राजकीय हस्तक्षेप असतो हे खरं आहे

ठळक मुद्देपोलीस दलाची कार्यपद्धती पूर्णपणे कालबाह्य झाली आहे, हे बदलण्याचं काम आयपीएस अधिकाऱ्यांनी केलं पाहिजेआरामात आयुष्य जावं, मुंबईत बदली व्हावी, चांगली पोस्टींग मिळावी हा विचार आयपीएस अधिकारी करतातराजकारण्याचं बळी व्हायचं की नाही हे पोलीस अधिकाऱ्याने ठरवायचं असतं

मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी(Mukesh Ambani Bomb Scare) आढळली होती, या प्रकरणी NIA तपास करत आहेत, या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे, त्यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. या संपूर्ण प्रकरणावर निवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी भाष्य केले आहे. राजकारण्याचं आयुष्य फक्त ५ वर्ष असतं मग त्यांचं कशाला काहीही ऐकायचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.(Retired IPS Officer Suresh Khopade on Sachin Vaze Case)  

सचिन वाझेंना पोलीस सेवेत पुन्हा घेण्याचा निर्णय सरकारचा नाही, तर...?; गृहमंत्री अनिल देशमुखांचा मोठा खुलासा

याबाबत लोकमतनं सुरेश खोपडे यांच्याशी संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले की, लोकशाही प्रक्रियेत पोलिसांना काम करताना राज्यकर्त्यांचे ऐकावं लागतं, राजकीय हस्तक्षेप असतो हे खरं आहे, कारण लोकप्रतिनिधींना लोकांना उत्तर द्यावं लागतं, पण सचिन वाझेंना त्यांच्या चुकीबद्दल अटक झाली, परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली झाली, लोकं म्हणतात राजकारण्यांनी यांचा बळी दिलाय, पण मी ३५ वर्ष पोलीस सेवेत काम केले आहे, राजकारण्याचं बळी व्हायचं की नाही हे पोलीस अधिकाऱ्याने ठरवायचं असतं, राजकारण्यांनी काहीही सांगितलं तरी प्रतिक्रिया काय द्यायची हे आयपीएस अधिकाऱ्यांच्या हातात असतं, म्हणून आयपीएस अधिकारी आणि वरिष्ठ पोलिसांवर दोष येऊन पोहचतो, मीदेखील आयपीएस अधिकारी म्हणून निवृत्त झालो, आमचं एकूण आयुष्य ६० वर्ष असतं, उघडपणे भानगडी न करता फक्त पाट्या टाकल्या तरी ६० वर्ष आम्हाला कोणीही हलवू शकत नाही, पण राजकारण्यांना ५ वर्ष आयुष्य असतं, मग हे लोक आपल्याला बदली व्यतिरिक्त काही करू शकत नाही असं माहिती असेल तर आयपीएस अधिकाऱ्याला मानानं काम करता येतं आणि योग्य व्यक्तिला न्याय देता येतो असं त्यांनी सांगितले.

“भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात असल्यानं दिल्लीवारी”

त्याचसोबत मी सातारला एसपी असताना एका गंभीर आरोपाखाली छत्रपती उदयनराजे(Chhatrapati Udayanraje Bhosale) यांना मंत्री असताना अटक करून गुन्हा दाखल केला होता, तेव्हा गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) गृहमंत्री होते, त्यांनी थेट मला उदयनराजेंना का अटक केली असा प्रश्न केला होता, तुम्ही आमच्या विरोधी आहात, बघून घेऊ असं ते म्हणाले होते, त्यानंतर माझी २ महिन्याने बदली करण्यात आली, पण काही फरक पडला नाही. मी माझं काम केले होते, अधिकारी बदलला म्हणजे तो दोषी होता हे सिद्ध होतं नसतं, बदली झाल्यानंतर तपास सुरु असतो, तपास सहसा बंद करता येत नाही, कायदेशीर प्रक्रिया पाहिली तर तपास कोर्टातच थांबवता येतो, बदली झाली तरी तपास प्रक्रिया थांबणार नाही असं सांगत सुरेश खोपडे यांनी परमबीर सिंग यांची बदली झाली तरी त्यांचा तपास होऊ शकतो असं म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईत मी ८ वर्ष नोकरी केली आहे, पोलीस दलाचा अभ्यास करून मी ७  पुस्तके लिहिली आहेत, पोलीस दलाची कार्यपद्धती पूर्णपणे कालबाह्य झाली आहे, हे बदलण्याचं काम आयपीएस अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे, राजकारण्यांना पोलीस दलातील सुक्ष्म गोष्टी कळत नाही, पण आरामात आयुष्य जावं, मुंबईत बदली व्हावी, चांगली पोस्टींग मिळावी हा विचार आयपीएस अधिकारी करतात, जर या गोष्टी सोडल्या तर पोलीस दलात खूप सकारात्मक बदल होती, पोलीस दलासोबतच राजकीय सिस्टिमही बदलण्याचा विचार व्हायला हवा असंही मत निवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी व्यक्त केलं आहे.

पाहा संपूर्ण मुलाखत 

 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMumbai policeमुंबई पोलीसPoliticsराजकारणPoliceपोलिसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपा