शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

गोवंश हत्याबंदी धार्मिक, प्रतिष्ठेचा मुद्दा करू नका!

By admin | Published: March 10, 2015 4:14 AM

महाराष्ट्र सरकारने केलेला गोवंश हत्याबंदीचा कायदा हा लोकांनी धार्मिक आणि प्रतिष्ठेचा मुद्दा करू नये, असे आवाहन करत मुंबई उच्च

मुंबई : महाराष्ट्र सरकारने केलेला गोवंश हत्याबंदीचा कायदा हा लोकांनी धार्मिक आणि प्रतिष्ठेचा मुद्दा करू नये, असे आवाहन करत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकरणी मुंबईतील मटण विक्रेत्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.न्या. विद्यासागर कानडे व न्या. ए. आर. जोशी यांच्या खंडपीठाने म्हटले की, गार्इंखेरीज बैल आणि वळू यांच्या कत्तलीस प्रतिबंध करणारा कायदा राजपत्रात अधिसूचित करण्यात आल्याने आता लागू झाला आहे. त्यामुळे बेकायदा कत्तल होत असेल तर कारवाई करणे आता अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. (त्यामुळे) कृपया हा धार्मिक व प्रतिष्ठेचा मुद्दा करू नये, असे आवाहन त्यांनी केले. या कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जावी यासाठी भारतीय गोवंश रक्षण-संवर्धन परिषदेने याचिका केली आहे. त्या सुनावणीत सहभागी होण्यासाठी ‘बॉम्बे सबर्बन बीफ डीलर्स वेल्फेअर असोसिएशन’ने अर्ज केला आहे. आधीच्या तारखेला असोसिएशनच्या वकिलाने असे म्हणणे मांडले होते की, राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली असली तरी हा कायदा राजपत्रात अधिसूचित झाल्यावरच लागू होईल. त्यामुळे आमच्याविरुद्ध तोपर्यंत काही कारवाई करता येणार नाही. सरकारच्या वकिलाने कायद्याची अधिसूचना न्यायालयात सादर केली. ती रेकॉर्डवर घेत न्यायालयाने आता कायदा लागू झालेला असल्याने आम्ही तुम्हाला काही अंतरिम दिलासा देऊ शकत नाही, असे सांगितले. या कायद्यानुसार गोवंशाची हत्या करणाऱ्यास अथवा त्यांचे मांस जवळ बाळगणऱ्यास किंवा विकणाऱ्यास ५ वर्षांचा कारावास व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. (विशेष प्रतिनिधी)