शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

“ठाकरे व पवार पाठीत खंजीर खुपसणारे राजकारणी, हे चंद्रकांत पाटलांचे वास्तववादी भाष्य”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 16:01 IST

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाशी सहमत असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.

नांदेड: गेल्या अनेक कालावधीपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात विविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. कोरोना निर्बंधांपासून ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा एकच चेहरा होता, आता दोन चेहरे झालेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावर, चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेशरद पवार यांच्यावर केलेले भाष्य हे वास्तववादी असून, आपण समहमत असल्याचे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. (sadabhau khot gave support to statement of chandrakant patil on uddhav thackeray and sharad pawar)

“केवळ महिला घरात असताना CBI ने कारवाई करणे चुकीचे”; सुप्रिया सुळेंची टीका

भाजपची स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरू आहे. युतीत निवडणूक लढणार नाही. फक्त जे प्रामाणिकपणे आपल्यासोबत आहे, ज्यांच्यासोबत निवडणूक लढवणार. पण नाव मोठे लक्षण खोटे आपल्याला नको. पाठीत खंजीर खोपसणारे आपल्याला नको अशी टीका करत  पाठीत खंजीर खुपसणारे एकच नाव आधी होते, पण आता दुसरा चेहरा दिसतोय, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी थेट शिवसेनेवर घणाघात केला. याला सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दर्शवला आहे. 

“यात काडीमात्र तथ्य नाही, हा फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न”; भुजबळांचे प्रत्युत्तर

अनेकांना सत्तेसाठी चकवा दिला

शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल कुठेही विकता आला पाहिजे. परंतु ज्यावेळी कृषी विषयक सभागृहात आले, त्यावेळी मात्र त्यास मूक संमती दिली. त्यांनी सत्तेसाठी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली. अनेकांना सत्तेसाठी चकवा दिला. त्यांची जी कुटणीती आहे ही महाराष्ट्राला परिचित आहे. म्हणून देशपातळीवरील राजकारणात शरद पवारांना अथवा त्यांच्या एखाद्या घोषणेला फारसे महत्व दिले जात नाही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला. 

केंद्रातील मोदी सरकार म्हणजे सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’; काँग्रेसचा घणाघात

शरद पवारांची चाल महाराष्ट्राला माहितीय

शरद पवार हे चकवा देणारे राजकारणी आहेत, हे देशपातळीवरील राजकारण्यांना माहिती झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व शरद पवारांची चाल महाराष्ट्राला माहित झाली आहे. म्हणून चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाशी सहमत असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. 

“आता जितेंद्र आव्हाड यांचा नंबर; लिस्टमधील १२वा खेळाडू!”; किरीट सोमय्यांचा दावा

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी मार्ग खुले असल्याचे सांगत आमच्या पाठीत खंजीरच खुपसला होता. विधानसभा निकालावेळी ४ वाजता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होती. त्यावेळी मी पुण्यातून येत होतो. पण, उद्धव ठाकरेंनी ४ वाजताची पत्रकार परिषद तुमची तुम्ही करा आणि माझी मी करतो असे म्हटले. तिथेच गडबड झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी सर्व मार्ग मोकळे आहेत असे म्हटले. त्यांना वेगळाच मार्ग निवडायचा होता, तर आधी युती का केली? सेनेने विश्वासघात केला, विश्वासघाताचेच नाव पाठित खंजीर खुपसणे आहे, असे पाटील म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSadabhau Khotसदाभाउ खोत chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना