शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

भाजीपाल्यासाठी बाहे गाव जिल्ह्यात अग्रस्थानी

By admin | Published: April 07, 2017 2:41 AM

भाजीपाला पिकाच्या क्षेत्रात सर्वस्वी योगदान देऊन संपूर्ण रायगड जिल्ह्यात एक वेगळे वैशिष्ट्य निर्माण केले आहे

मिलिंद अष्टिवकर,रोहा- कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या संत चोखामेळाच्या वचनाप्रमाणे ज्या गावाने कर्म हीच देवपूजा मानून स्वत:चा चरितार्थ चालवून भाजीपाला पिकाच्या क्षेत्रात सर्वस्वी योगदान देऊन संपूर्ण रायगड जिल्ह्यात एक वेगळे वैशिष्ट्य निर्माण केले आहे असे रोहे तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गाव. कसदार व ताज्या भाजीसाठी केवळ रोहे तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याला हेवा वाटावा असे हे गाव. गेल्या अनेक पिढ्यांपासून या गावाने आपला हा व्यवसाय जतन करून ठेवला आहे. रोह्यातून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या निसर्गरम्य कुंडलिका नदीच्या तीरावर हे गाव वसले आहे. बारमाही वाहणाऱ्या कुंडलिका नदीच्या तीरावर असलेल्या आपल्या शेतीमध्ये या गावात पिढ्यानपिढ्या भाजीपाल्याची शेती पिकविली जात आहे. भाजीपाला क्षेत्रातील सारी कौशल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत आहेत, तर आज या क्षेत्रात गावातील केवळ वडीलधारी मंडळीच नव्हे तर उच्चशिक्षित तरुणाईनेही आपापली नोकरी सांभाळून झोकून दिले आहे.भाजीपिकांवर कितीही संकटे आली तरी येथील शेतकरी साऱ्या गोष्टींवर मात करीत किमान स्वत:च्या चरितार्थापुरते तरी उत्पादन घेताना दिसत आहेत. येथील भाजीपाल्याच्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे साऱ्यांनाच येथील भाजीचे वेगळे आकर्षण आहे. उन्हाळी हंगामात नदीच्या पाण्यावर येथील शेतकरी कित्येक एकराच्या परिसरात भाजीपाल्याची लागवड करीत आले आहेत. रासायनिक खते व कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून केवळ अंगमेहनत व चिकाटीच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी आपला व्यवसाय टिकून ठेवला आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाजीपेक्षा येथील भाजीचा दर्जा चांगला असल्याने तसेच ताजी भाजी व किफायतशीर दर यामुळे ग्राहकांचीही पहिली पसंती या भाजीलाच येते.उन्हाळी हंगामात भातशेतीला पाणी मिळत नाही. याशिवाय गावाच्या बाजूलाच एमआयडीसीत कारखाने आहेत. परंतु स्थानिकांना येथे कायमस्वरूपी नोकरी मिळत नसल्याने येथील शेतकरी व तरुण वर्गाने आपल्या हक्काची रोजीरोटी म्हणून भाजीपाल्याच्या शेतीकडे विशेष लक्ष दिले आहे. भाजीचे उत्पादन चांगले आले तर संपूर्ण वर्षभराच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतो, तर कधी उत्पादन कमी आले तर फक्त तात्पुरता चरितार्थ चालतो. येथील शेतीमळ्यात पिकणारी भाजी शेतकरी डोक्यावर टोपले घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावात फिरत असतात,तर रोह्याची बाजारपेठ तसेच विविध आठवड्यांचे बाजार येथे विकली जाते. काही वर्षांपासून पुणे, महाड, पेण, पनवेल व नवी मुंबई येथील घाऊक व्यापारी थेट शेतमळ्यावर येऊन भाजी खरेदी करीत असल्याने मालाला उठाव देखील चांगला होत आहे, याशिवाय श्रम व पैशांचीही चांगली बचत होत आहे. या व्यापारात शेतकरीवर्गाला बऱ्यापैकी आर्थिक लाभ होताना दिसत आहे. शेतकरी वर्गाने चालविलेला पिढीजात व्यवसाय आधुनिक काळात देखील आदर्शवत ठरत आहे.